Dainik Maval News : राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल विभागाच्या पुढील शंभर दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
आपल्याकडे एक उपरोधिक म्हण आहे, सरकारी काम आणि दहा महिने थांब. कोणत्याही छोट्यात छोट्या शासकीय कामासाठी जाणारा प्रचंड कालावधी, हेलपाटे मारणे यातून ही म्हण जन्माला आली. मात्र, आता लोकांचे हेलपाटे लवकरच बंद होणार आहेत. कोणत्याही नोंदणीच्या कामासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात वारंवार जावे लागते. त्यात जाणारा वेळ वाचावा यासाठी ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
घरबसल्या करा दस्त नोंदणी
कोणत्याही दुय्यम निबंध कार्यालयात दस्त नोंदणी करण्याकरता ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. या संकल्पनेमुळे नागरिकांना आता घरबसल्या दस्त नोंदणी करता येणार आहे. सोबतच महसूल विषयक दस्त नोंदणी करता फेसलेस प्रणाली देखील राबवली जाणार आहे.
दस्त नोंदणी म्हणजे काय?
मृत्युपत्र, खरेदीखत, अभिहस्तांतरण, खरेदीखत, करारनामा, भाडेपट्टा, गहाणखत, अदलाबदल पत्र, बक्षीसपत्र, वाटपपत्र असे विविध प्रकारचे दस्त नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– निर्णयाचे ढोल वाजविले… आता पुढे काय ? पुणे – लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्र्रॅकचे काम अद्यापही फायलीत अडकले
– महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ , गतीमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय, जाणून घ्या अधिक
– पाणी पुरवठा योजनांची कामे ठरविलेल्या मुदतेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार