Dainik Maval News : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो.
आगामी पावसाळा व परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य 30 जून 2025 पूर्वीच रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य 30 जून 2025 पर्यंतच रास्तभाव दुकानांमधून उचलावे, असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर
– मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी