Dainik Maval News : मावळ तालुक्यातील इंदोरी जवळील कुंडमळा या पर्यटनस्थळी इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत जणांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 52 जण जखमी झाले आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले आहे. सोबत जखमींचा उपचार खर्चही राज्य सरकार करेल असे सांगितले आहे.
काय म्हटलेत मुख्यमंत्री?
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त
“पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार २ जणांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– BREAKING : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती
– कुंडमळा पूल दुर्घटना : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 51 जखमी, अजुनही शोधकार्य सुरू
– कुंडमळा येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, दोषींवर कठोर कारवाई होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार । Kundmala Indrayani River Bridge Accident