Dainik Maval News : मागील आठवड्याभरापासून धो-धो कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने मंगळवारपासून काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मावळ परिसरात मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरला असून सर्वसामान्य नागरिकांनाही पावसाच्या कचाट्यातून मोकळीक मिळाली आहे.
आठवड्याभरापासून कमी अधिक प्रमाणात सुरू राहिलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे संपूर्ण नियोजन बिघडले होते. तालुक्यात जवळपास सर्व शेतकऱ्यांची भात पेरणी रखडली होती. तर, चार-पाच दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा उन्हाळी पिकांसोबत फळभाज्या, पालेभाज्यांना मोठा फटका बसला. शेतातील पीक नुकसानग्रस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.
मावळात गेल्या आठ-दहा दिवसांपासून विविध भागात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडला, तर गेल्या चार दिवसांत तालुक्याच्या कानाकोपऱ्यांत दमदार पाऊस कोसळला. अचानक मान्सूनसारख्या सुरू झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या बाजरी, ज्वारी, भुईमूग आदी उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पूर्व भागात फळभाज्या व पालेभाज्यांनाही या पिकाचा फटका बसला.
दरम्यान, मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरला असून बुधवार – गुरुवारी जवळपास सर्वत्र पावसाने उघडीप दिली होती. यामुळे शेतकऱ्यांना आता शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्याची घाई असून चांगली ताप पडण्याची अपेक्षा आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर
– मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी