पानिपतावरची लढाई 14 जानेवारी 1761 रोजी झाली. पानिपतात महाराष्ट्राच्या मातीतील अनेक मोहरे गमावले. लाखो बांगड्या फुटल्या होत्या. अनेक परागंदा झाले होते. कित्येक गुलाम करुन आफगाणीस्थानात नेले होते. किती नुकसान झाले याची गणतीच नव्हती. स्वराजावर झालेला मोठा आघात होता तो. त्यानंतर पेशवाईत सत्ता संघर्ष सुरु झाला. या सत्ता संघर्षाचा फायदा घेऊन मराठी साम्राज्य गिळंकृत करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी प्रयत्न करीत होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या काळात नारायणरावाची हत्या झाल्यावर रघुनाथराव (राघोबा) पेशवे झाले. आणी पेशवेपदासाठी ते आपल्याच राज्यावर ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने पुण्यावर चालून आले. पानिपतावर झालेली हानी आणी ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य यामुळे खिळखिळे झालेले मराठी साम्राज्य किती काळ तग धरेल, या आशेवर इंग्रज मराठी साम्राज्यावर युद्धासाठी मुंबईहून निघाले. तेव्हा मराठी सैन्याचे सेनापतीपद महादजी शिंदे यांच्याकडे होते. हे दत्ताजी शिंदेचे भाऊ होते, जे स्वत:ही पानिपतावरील लढाईत पाय गमाऊन परत स्वराज्याच्या सेवेत दाखल झाले होते. ( Treaty of Vadgaon Battle between British and Marathas Vadgaon Maval January 16 1779 Mahadji Shinde Statue )
- खुद्द रघुनाथराव इंग्रजांना मिळाले होते. सन 1779 पावसाळा संपल्यानंतर इंगजांनी मुंबईहून साधारण 4000 फौजेसह पुण्याकडे प्रयाण केले. रघुनाथरावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. खुद रघुनाथराव इंग्रजांना मिळाले होते. त्यामुळे इतरही सरदार त्याला येऊन मिळतील, या आशेवर मोठया उत्साहाने इंग्रज पुण्याकडे निघाले. जसा अफजलखानही विजापूरहून निघाला होता. त्यालाही मराठी गनिमी काव्याची माहिती नव्हती. त्याच युध्दा प्रमाणे काहीशी योजना महादजी शिंदेनी आखली.
शत्रुला आपल्या अनकुल भूमीवर आणायचे आणी त्याला अंदाज येण्याचा आत त्याचा समुळ पराभव करायचा हा डाव मराठी सैन्यानी आखला. इंग्रज खोपोली पार होई पर्यंत मराठी सैन्याने कोणतीच हालचाल केलेली दाखविली नाही. त्यामुळे आता पुणे हातात आलेच, हे गृहीत धरुन राघोबा आणी इंग्रज पुण्याचा दिशेने वेगात पुढे सरकु लागले. त्यांना पहिला झ्टका कार्ले इथे बसला. गनिमी काव्यात तरबेज मराठी फौजेने अजानक इंग्रज फौजेवर छापामार पध्दतीचा हल्ला केला. बेसावध इंग्रज फौजेचे मोठे नुकसान केले. त्याची रसद तोडली. साते कान्हे कामशेत् भागात छापामार पध्दतीने मागून हल्ले करीत मराठे इंग्रजांना हैराण करीत होते. प्रत्यक्ष लढाईला सामोरे जावे लागेल यांचा अंदाज इंग्रजांना आला होता. इंग्रजांनी सैन्याची पूढील तयारी कराण्याचे ठिकाण तळेगांव निवडले.
इंग्रज काय रणनिती आखू शकतात याचा पूर्ण अभ्यास केलेले सेनापती महादजी शिंदे यांनी मराठी सैन्य व्यूहरचने अर्तंगत पूर्वीच वडगांव येथील एका टेकडी मागे लपवून ठेवले होते. मराठ्यांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली (9 जानेवारी 1779), पण मराठयांनी तळेगाव सुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठे सुद्धा विषारी होते.
तळेगांव येथे पुढे गेलेले सैन्य पुन्हा वडगांव येथे आले तो पर्यंत टेकडी मागून जोरदार हल्ला केला. तो दिवस होता 13 जानेवारीला 1779. 14 च्या सकाळी इंग्रज सेनापती जेम्सस्टुअर्ट (ज्यास स्थानिक भाषेत फाकडा म्हणतात) महादजी शिंदेंच्या फौजे कडून वडगांव मावळ येथे मारला गेला. इंग्रजानी पराभवाचे पांढंरे निशाण फडकविले पानीपतानंतर अवघ्या आठवर्षात मराठी साम्राज्य पुन्हा उभे राहिलेले या लढाईनंतर दिसले. अखेर 16 जानेवारी 1779 ला महादजी शिंदेनी इंग्रजांचा पराभव केला. त्यामुळे या 16 जानेवारी हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी जो तह झाला, या तहास ‘वडगावचा तह’ असे म्हंटले जाते.
समोरा समोरील लढाईत मराठी फौजे इंग्रंजाचा पराभव केला होता. त्यामुळे वडगांवची लढाई महत्वाची मानली जाते. इस्टुर फाकडाची कबर आजही वडगांव येथे पहावयास मिळते. त्याचा दरवर्षी 25 डिसेंबरला मोठा उत्सव होत होता, तो इतिहास प्रेमीनी बंद पाडला. या विषयी जनजागृती मोहीम हाती घेतली. त्यातून एक स्वयंसेवकाची फळी उभी केली आहे. या विजयाची आठवण म्हणून ज्या ठिकाणी लढाई झाली. त्या ठिकाणी सेनापती महादजी शिंदे यांचा पुतळा आणी विजयस्तंभ आलीकडच्या काळात उभा केला आहे. इंग्रज- मराठा युद्धाच्या वेळी ब्रिटिशांच्या आत्मसमर्पणांचे वर्णन करणारे भित्तिचित्र. म्यूरल हे या स्मारकाचे वैशिष्टआहे.
आपल्या इतिहासाची माहिती व ज्ञान पिढयांन पिढया जतन करण्यासाठी महादजी शिंदे यांच्या नावाने भव्य ग्रंथालय पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने उभारण्यात येत आहे. 14 जानेवारी 1761 च्या पानिपताच्या हानी नंतर 16 जानेवारी 1779 मध्ये मराठी सैन्याने इंग्रजांचा समोरा समोरील लढाईत केलेला दारुण पराभव दत्ताजी शिंदे यांच्या पानिपतावरील घोषणेची सत्यता जागा पुढे खरी करुन दाखविली आहे. वडगांवचा स्तंभ हा मराठयांचा विजयस्तंभ आहे. यास आपण दर वर्षी 16 जानेवारीला वडगांव येथे येऊन मानवंदना दिली पाहिजे.
लेखन – अजित दि. देशपांडे ( लेखक संत साहित्य आणी भारतीय पुरातत्व विद्याअभ्यासक आहेत)
अधिक वाचा –
– तळेगाव येथील रुडसेट संस्थेला पशुसंवर्धन विभाग उपायुक्तांची भेट; शेळी-मेंढी पालन शिबिरार्थींना केले मार्गदर्शन । Talegaon Dabhade
– श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला मावळ तालुक्यात मांस आणि मद्य विक्रीला बंदी? भाजपाचे तहसीलदारांना निवेदन
– ‘आता सरकारला वेळ द्यायचा नाही’ म्हणत मनोज जरांगेंनी सांगितला ‘चलो मुंबई’चा प्लॅन, मावळात ‘इथे’ होणार मुक्काम । Maratha Reservation