भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष निमित्त आणि देशाच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत घालून देण्यात आलेल्या निकषाची पुर्तता केलेल्या राज्यातील कारागृहातील 189 बंद्यांची सुटका करण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या आणि निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत निकष ठरवण्यात आले होते. ( 189 Prisoners Released From Jails In State To Mark Amrit Mahotsav of Independence And Republic Day )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानुसार, अमरावती मध्यवर्ती कारागृहातील 12, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह 11, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह 7, मुंबई मध्यवर्ती कारागृह 4, नागपूर मध्यवर्ती कारागृह 35, नाशिक मध्यवर्ती कारागृह 35, तळोजा मध्यवर्ती कारागृह 16, ठाणे मध्यवर्ती कारागृह 11, येरवडा मध्यवर्ती कारागृह 20, अकोला जिल्हा कारागृहातील 3, भंडारा 3, चंद्रपूर 2, कोल्हापूर 2 सिंधुदूर्ग 4, वर्धा 2, वाशिम 1, यवतमाळ जिल्हा कारागृहातील 1, औरगांबाद खुल्या कारागृहातील 13, पैठण खुले कारागृह 4, येरवडा खुले कारागृह 1, येरवडा महिला कारागृतील 2 असे एकूण 189 बंद्यांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– परीक्षा पे चर्चा 2023 : पंतप्रधान मोदींनी दिला यशाचा गुरुमंत्र, वडगावमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पाहिला कार्यक्रम
– मावळकट्टा । लोणावळा-खंडाळा येथील शिवकालीन अज्ञात व्यक्तीची ‘ही’ समाधी-छत्री अभ्यासकांचे वेधतेय लक्ष