Dainik Maval News : भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी आणि महाराष्ट्राचा कणा असलेले मुंबई शहर मागील एका दशकापासून परिवर्तनाचा नवा अनुभव घेत आहे. यातूनच मुंबईची तुलना थेट जागतिक स्थरावरील महानगरांसोबत होत आहे. एकेकाळी रखडलेले प्रकल्प, वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांवरील प्रचंड ताण यातून मुंबई शहराचा विकासरथ मंदावला होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबविलेल्या ‘मुंबई ट्रान्सफॉर्मेशन’ या धोरणाने शहराला नवी दिशा आणि कलाटणी दिली आहे.
शहरात पायाभूत सुविधांचे जाळे :
मुंबईच्या विकासाचा कणा म्हणजे इथली वाहतूक व्यवस्था. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राज्याचे नेतृत्व आल्यापासून ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम’वर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात केवळ कागदावर असलेले प्रकल्प प्रत्यक्षात जमिनीवर आले आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण होऊ लागले.
१. अटल सेतू – मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ हा केवळ एक पूल नसून तो राज्याच्या प्रगतीचा महामार्ग ठरला आहे.
२. कोस्टल रोड – दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि नरिमन पॉइंट ते कांदिवली असा विनाअडथळा प्रवास करण्यासाठी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाची आखणी करण्यात आली. पर्यावरणीय आव्हाने आणि तांत्रिक अडचणींवर मात करत हा प्रकल्प आज मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करत आहे.
३. मेट्रो प्रकल्पांचे पुनरुज्जीवन – मुंबईत मेट्रोचे जाळे विणण्याचे स्वप्न दशकांपासून पाहिले जात होते, पण त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात गती मिळाली. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) या भूमिगत मेट्रोपासून ते मेट्रो-२ए आणि मेट्रो-७ या मार्गांपर्यंत, मुंबईच्या उपनगरांना जोडण्यासाठी मेट्रोचे जाळे अत्यंत वेगाने विस्तारले गेले. आज लाखो मुंबईकर या मेट्रो सेवेचा लाभ घेत आहेत.
आर्थिक क्रांती आणि जागतिक दर्जाचे नियोजन –
मुंबईला केवळ रस्ते बांधून चालणार नाही, तर तिची आर्थिक क्षमता वाढविणे गरजेचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला ‘ग्लोबल फायनान्शिअल हब’ बनवण्यासाठी दूरगामी पावले उचलली आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ -़
वाढत्या हवाई वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुंबईत दुसऱ्या विमानतळाची नितांत गरज होती. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा फडणवीसांच्या ‘व्हिजन’चा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि रायगड परिसराचा विकास झाला असून तिथे रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होत आहेत.
डेटा सेंटर आणि डिजिटल पायाभूत सुविधा –
मुंबईला आशियातील सर्वात मोठे ‘डेटा सेंटर हब’ बनवण्यासाठी फडणवीस यांच्या सरकारने विशेष सवलती आणि धोरणे राबवली. यामुळे जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी मुंबईत आपली कार्यालये आणि सर्व्हर्स सुरू केले आहेत, ज्यामुळे मुंबईची ओळख आता ‘फिनटेक सिटी’ म्हणून होत आहे.
धारावी पुनर्विकास आणि झोपडपट्टी पुनर्वसन –
जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा कायापालट करण्याचे स्वप्न फडणवीसांनी पाहिले आणि त्याला कायदेशीर व आर्थिक स्वरूप दिले. या पुनर्विकास प्रकल्पामुळे तिथल्या रहिवाशांना हक्काचे घर आणि रोजगाराची नवीन साधने मिळणार आहेत.
वॉटर टॅक्सी आणि जलवाहतूक –
मुंबईचा विस्तीर्ण समुद्रकिनारा असूनही जलवाहतुकीचा वापर अल्प होता. फडणवीस यांनी वॉटर टॅक्सी आणि रो-रो फेरी सेवा सुरू करून मुंबई-नवी मुंबई आणि अलिबाग दरम्यानचा प्रवास सुलभ केला.
प्रशासकीय पारदर्शकता –
प्रकल्प केवळ जाहीर करणे सोपे असते, पण ते पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय इच्छाशक्ती लागते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयात ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ स्थापन केली. या माध्यमातून मोठ्या प्रकल्पांमधील अडथळे, पर्यावरण परवानग्या आणि जमीन संपादनाचे प्रश्न एकाच टेबलावर सोडवले गेले.
भविष्याच्या दृष्टीने शाश्वत विकास –
केवळ काँक्रीटचे जंगल न उभारता, मुंबईला शाश्वत शहर बनविण्यावरही भर दिला जात आहे. ‘इलेक्ट्रिक बसेस’चा ताफा वाढवणे, किनारपट्टीचे रक्षण करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे मोठे प्रकल्प राबवून समुद्राचे प्रदूषण कमी करणे, यावर फडणवीस सरकारने विशेष लक्ष दिले आहे.
मुंबईची वाढती लोकसंख्या आणि मर्यादित जमीन हे सर्वात मोठे आव्हान होते. यावर उपाय म्हणून ‘व्हर्टिकल डेव्हलपमेंट’ आणि ‘ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट’ यांसारख्या आधुनिक संकल्पना फडणवीसांनी अमलात आणल्या. त्यामुळे रेल्वे आणि मेट्रो स्थानकांच्या आसपास सोयीसुविधांचे जाळे निर्माण होत आहे.
आजची मुंबई – उद्याचे भारताचे भविष्य
मुंबई ही केवळ एक शहर नाही, तर ती देशाची ऊर्जेचे केंद्र आहे. येणाऱ्या काळात मुंबई ही जगातील सर्वोत्तम पाच महानगरांपैकी एक म्हणून गणली जाईल, यात शंका नाही. विकासाचा हा ‘मुंबई पॅटर्न’ आज इतर राज्यांसाठीही अभ्यासाचा विषय ठरला आहे.
“मुंबईकरांचे जीवन सुसह्य करणे आणि शहराला जागतिक स्पर्धेत टिकवून ठेवणे” या ध्येयाने प्रेरित होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या नवनिर्माणाचा जो पाया रचला आहे, तो येणाऱ्या पिढ्यांसाठी एक अनमोल ठेवा ठरेल. आजची मुंबई ही आधुनिक, वेगवान आणि सर्वसमावेशक आहे. या परिवर्तनाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव आग्रहाने घेतले जात आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मुंबईच्या विकासाचा वारू कोण रोखू पाहतंय ? देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि ‘स्वप्ननगरी’ विकासाच्या रुळावर
– मराठी अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर ? ठाकरेंची मुंबई महापालिकेतील सत्तेची २५ वर्षे आणि मराठीचा टक्का
– मराठी अस्मिता विरुद्ध परकीय घुसखोरी : निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईच्या जनसांख्यिकीय बदलाचा मुद्दा केंद्रस्थानी
