Dainik Maval News : पर्यटननगरी लोणावळा शहर आणि शहराजवळील भूशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट ही ठिकाणे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र असून येथे वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते. थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटनासाठी सुस्थितीत असलेले ठिकाण म्हणून लोणावळा आणि परिसराची ओळख आहे. परंतु अलिकडील काळात या भागात होणारे लहान मोठे अपघात, खास करून लायन्स पॉइंट येथे होणारे अपघात आणि आत्महत्यांचे वाढते प्रमाण यामुळे पर्यटनस्थळ नाहक बदनाम होत आहे.
गुरुवारी (दि.१२) पुन्हा एकदा लायन्स पॉइंट येथे एका युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विरेंद्र सिन्हा (वय ३२) असे तरूणाचे नाव असून तो सध्या पुणे, बाणेर येथील एका आयटी कंपनीत कामाला होता. त्याने आत्महत्या केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. गुरुवारी सकाळी त्याची चारचाकी गाडी लायन्स पॉईंट येथे पार्क केलेली आढळली. तिथूनच त्याने मित्रांना आणि पत्नीला मेसेज केल्याची माहिती हिती मिळत आहे.
प्राप्त माहितीच्या आधारे, गाडी पार्क केल्याच्या ठिकाणी शोध सुरु केला असता ज्या ठिकाणी गाडी पार्क केली होती तेथील समोरील दरीत साधारण २५० फूटांवर विरेंद्र सिन्हा याचा मृतदेह आढळला. संध्याकाळी साधारण ४.३० च्या सुमारास मृतदेह वर काढून शिवदुर्ग रेस्कू टीमने मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन केला.
शिवदुर्गचे योगेश उंबरे, महेश मसने, आयुष वर्तक, आयुष पवार, देवश्री चिले, सचिन गायकवाड सर, कुणाल कडू, कपिल दळवी, योगेश दळवी, सागर दळवी, सागर कुंभार, अनिल आंद्रे, गणेश भांगरे, पिंटू मानकर, महादेव भवार, गणेश म्हसकर, ज्ञानेश्वर आखाडे, संतोष मरगळे, चंद्रकांत गाडे, आनंद गावडे यांनी शोधकार्यात सहभाग घेतला.
दरम्यान, दहा दिवसांपूर्वी याच ठिकाणी मुंबईतील एका तरुणीने देखील आत्महत्या करून आपले जीवन संपवले होते. मागील काही काळाचा विचार करता या ठिकाणी अनेक तरुण-तरुणींनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचमुळे लायन्स पॉईंट या ठिकाणाची ओळख सुसाईड पॉइंट अशी होऊ लागली आहे.
सदरचा पॉईंट हा वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे वन विभागाने व प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षेच्या उपायोजना करत सुरक्षा रक्षक तैनात करावे तसेच या संपूर्ण पॉईंटच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– शेतजमिनीवर बांधकामासाठी अकृषक (एन.ए.) परवानगीची अट रद्द, बांधकाम आराखडा हीच परवानगी ; जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू