Dainik Maval News : कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच रूपेश अरुण गायकवाड यांनी गुरुवारी (दि.१९) पत्रकार परिषद घेत २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कार्यकाळात सुमारे २५ कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा लेखाजोखा सादर केला. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित परिषदेत त्यांनी विविध कामांचा सविस्तर आढावा देत, हा दावा केला.
येत्या २४ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने सरपंच रूपेश गायकवाड यांनी आढावा मांडला. या पत्रकार परिषदेला माजी उपसरपंच नीलेश दाभाडे, दत्तात्रेय शिंदे तसेच सदस्य परेश बरदाडे उपस्थित होते. गायकवाड यांनी ग्रामस्थांनी पाच वर्षे काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, त्या निधीतून पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात आल्याचा दावा सरपंच गायकवाड यांनी केला.
केलेल्या कामांत कामशेत शहरातील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे, महिलांसाठी सांस्कृतिक भवन उभारणी, नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम, निवाराशेड उभारणी आणि पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा अशी अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या विकासकामांमुळे गावाच्या प्रगतीला गती मिळाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच पुढे बोलताना गेल्या पाच वर्षांत नकळत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यापुढील काळात निवडणूक लढवो अथवा न लढवो, जनतेच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचा गंभीर आरोप
– वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे
– वडगाव येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे
– चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू
