Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन मान्यवरांचा नवी दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. आढे ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच सुनिता ज्ञानेश्वर सुतार, वडगाव मावळ येथील उद्योजक संतोष पांडुरंग भिलारे व प्रसिद्ध व्याख्याते विवेक गोविंदराव गुरव यांना महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी, अल्पसंख्याक सदस्य रेंचलना यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी मंचावर अभिनेत्री माजी खासदार नुसरत जहाँ, प्रेरणा शर्मा भाटिया, डॉ मनीष गवई, किशोर मकवान, ठाकूर चंदनसिंग, राहुल उके आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी अर्थात शुक्रवारी (दि.3) हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रासह गोवा, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उडीसा, उत्तर प्रदेश आदी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मावळातील सर्व पुरस्कारार्थींचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News