Dainik Maval News : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियान साठी मावळ तालुक्यातील दारुंब्रे, चांदखेड, धामणे या तीन गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये पुढील तीन वर्षांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. याची प्राथमिक तयारी म्हणून दारुंब्रे ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक पार पडली.
सदर बैठकीला मावळ तालुका कृषि अधिकारी सूर्यकांत कुंभार, मंडळ कृषि अधिकारी प्रशांत डहाळे, कृषि पर्यवेक्षक मिनाज शेख, कृषि सहायक विकास गोसावी, सरपंच उमेश आगळे, पोलीस पाटील सार्थक वाघोले, ग्रामसेवक नासिर पठाण, अनिल वाघोले, रामदास वाघोले, श्रीकांत वाघोले, गणेश वाघोले, शरद भालेकर, सुरेश वाघोले, राजू वाघोले उपस्थित होते.
तालुका कृषि अधिकारी सूर्यकांत कुंभार यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांना योजना कशा प्रकारे राबविली जाणार, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
- नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत केंद्र सरकार साठ टक्के, राज्य सरकार चाळीस टक्के हिस्सा घेऊन निधी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेअंतर्गत गावामध्ये पन्नास हेक्टर क्षेत्राचा एक गट स्थापन करायचा आहे. त्यामध्ये प्रति शेतकरी जास्तीत जास्त एक एकरचा लाभ द्यायचा असून प्रति गट 125 शेतकरी लाभार्थी होतील.
सदर योजनेमध्ये सहभाग घेतलेल्या लाभार्थींना प्रथम तज्ञ प्रशिक्षक, शास्त्रज्ञ यांच्याकडून प्रशिक्षण, सेंद्रीय शेती अभ्यास दौरे द्वारे प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभ घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अन्य सहा शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करावयाचे आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात भूकंप ! विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंविरोधात प्रचार केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आठ दिग्गज नेत्यांचे पक्षातून निलंबन
– पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी
– वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन