Dainik Maval News : कामशेत शहरात दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो. ग्रामपंचायतीमार्फत विक्रीसाठी आलेल्या शेतकरी, व्यापारी यांना शंभर रूपयांची पावती दिली जाते. परंतु काही व्यापाऱ्यांकडून पन्नाल रुपये पावती न देता घेतले जातात. तर काहींना जुन्या पावत्या दिल्या जातात. ही रक्कम कुणाकडे जमा होते. याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू शिंदे यांनी केली आहे.
गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, “आठवडे बाजारात बाहेरगावाहून शेतकरी व विविध व्यापारी दर मंगळवारी येतात. कामशेत ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांच्याकडून शंभर रूपयांची रक्कम घेऊन पावती दिली जाते. मात्र या प्रकरणी लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असून याबाबत चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.”
अभिमन्यू शिंदे व काही नागरिकांनी मंगळवारी बाजारात जाऊन अनेक व्यापाऱ्यांकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान म्हणाले, “मला आठवडे बाजारामधील बाजार पावतीबाबत होत असलेल्या गैर प्रकारांबाबत निवेदन मिळाले असून चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर
– मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी