Dainik Maval News : केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या संकल्पनेतून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात दिनांक २९ मे ते १२ जुन २०२५ दरम्यान होणाऱ्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ सुरू आहे. यानिमित्ताने मावळ तालुक्यातील उर्से गावामध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ राहुल घाडगे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. घाडगे म्हणाले की, आपल्या शेतजमिनीची सुपिकता दिवसेंदिवस घटत आहे. परिणामी उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्पादन घटत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सेंद्रीय खतांचा होत असलेला कमी वापर. त्यामुळे जमिनीचा सैंद्रीय कर्ब कमी होत आहे आणि घटत चाललेला सेंद्रीय कर्ब यामुळे शेती तोट्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
- याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मारुती साळी, भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ तुकाराम भोर, शास्त्रज्ञ डॉ प्रांजली गेडाम, डॉ स्वाती साहा, उपकृषी अधिकारी विकास गोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी अश्विनी खंडागळे, सरपंच भारती गावडे, प्रगतशील शेतकरी सुभाष धामणकर व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भात संशोधन केंद्र वडगाव मावळ शास्त्रज्ञ तुकाराम भोर यांनी भाताच्या विविध जाती, भाताची नर्सरी तयार करण्याची पद्धत, चार सुत्री लागवड पद्धती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. मावळ तालुका कृषी अधिकारी मारुती साळी यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विकास गोसावी यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन अश्विनी खंडागळे यांनी केले. आभार शेतकरी भारत ठाकूर यांनी व्यक्त केले.
‘संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या महत्वाकांक्षी अभियानात कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञानी खरीप हंगामातील नियोजन, पिकांचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, सोयाबीन बीज प्रक्रिया, ड्रोन प्रात्यक्षिक, कृषी विभागाच्या विविध योजना आदींबाबत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रमाचे आयोजन केला होता. – राहुल घाडगे, विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र-नारायणगाव
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश