Dainik Maval News : दिनांक 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या पवना जलवाहिनी विरोधी आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येळसे येथे आयोजित श्रद्धांजली सभेला मावळ तालुका भाजपाचे प्रचारप्रमुख रविंद्र भेगडे हेही उपस्थित होते. यावेळी मनोगतादरम्यान भेगडे यांनी, क्रांतिदिनी शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना हा प्रकल्प जोपर्यंत रद्द होणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार, असे सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
क्रांती दिन निमित्त पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलना विरोधात पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबारात शहीद झालेल्या शहीद कांताबाई ठाकर, शहीद मोरेश्वर साठे आणि शहिद शामराव तुपे या शेतकरी बांधवांना येळसे येथील स्मृतिस्थळावर विविध सामाजिक संघटना तथा नागरिक यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या दुर्दैवी घटनेला शुक्रवारी 13 वर्षे पूर्ण झाले. ( fight will continue until Pavana Bandh Aqueduct Project is cancelled Ravindra Bhegde )
भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण करून, शाहिद शेतकऱ्यांना अभिवादन केले.यावेळी रविंद्र भेगडे म्हणाले की, ” शेतकऱ्यांनी आपल्या न्यायहक्कांसाठी उभारलेला लढा आणि त्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या प्राणांचे दिलेले सर्वोच्च बलिदान यांचे उदाहरण देशाच्या इतिहासात अजरामर झालेले आहे. काहीही झाले तरी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प जो पर्यंत कायमस्वरूपी रद्द होत नाही तो पर्यंत आमचा लढा सुरू होता आहे आणि सुरूच राहील.”
अधिक वाचा –
– रस्त्यांवरील खड्डे बुजवा, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा, खासदार श्रीरंग बारणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना । Pimpri-Chinchwad
– तळेगाव-चाकण-शिकापूर महामार्गावरील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन, वाचा आदेश । Pune News
– मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ? एकदा खात्री कराच, एका क्लिकवर होईल काम