लोकसभा निवडणूक 2024 ची प्रत्यक्ष मतमोजणी आज होत आहे. देशभरातील 543 लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया आज (दि. 4 जून) सुरु आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली असून दुपारचे 1 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपाचे अब की बार 400 पार चे स्वप्न भंगणार, असे चित्र दिसत आहे. कारण, इंडिया आघाडीने यंदा निवडणूकीत मोठी मुसंडी मारली आहे. त्यातही देशात भाजपा पाठोपाठ काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. परंतू हे चित्र बदलून 400 पारचा नारा खरा होईल, असे भाजपा कार्यकर्ते सांगत आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सध्या जे चित्र देशात दिसत आहे, त्यानुसार दुपारी 1 वाजेपर्यंत मतमोजणीत देशात एनडीए एकूण 298 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर इंडिया आघाडी 225 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर 22 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. सत्ता स्थापनेसाठी 273 जागांची आवश्यकता असते, त्यामुळे सध्यांच्या कलांनुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येऊ शकेल, असे दिसत आहे. परंतू 400 पार जाण्यासाठी भाजपा अर्थात एनडीएला मोठी कसरत करावी लागू शकते. ( Lok Sabha Election 2024 Results Live Updates NDA government will come but 400 par not possible? )
आज मतमोजणी सुरु झाल्यापासून दोन्ही आघाड्यांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरुवातीला पिछाडीवर होते, त्यामुळे ही मोठी गंभीर बाब भाजपाच्या आणि एनडीएच्या दृष्टीने होती. दुसरीकडे काँग्रेसचे नेते मात्र ठिकठिकाणी चांगल्या आघाडींवर दिसून आले. स्वतः राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीतून लाखांच्या लीडने पुढे आहेत. महाराष्ट्रात तर इंडिया आघाडीचाच डंका वाजताना दिसत असून इथेही भाजपाचे 45 पारचं स्पप्न पुर्ण होणार नाही, असं दिसतंय.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा निकाल Live : श्रीरंग बारणे तब्बल 20,690 मतांनी आघाडीवर, संजोग वाघेरे पिछाडीवर, एका क्लिकवर पाहा आकडेवारी । Maval Lok Sabha Result
– मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी
– बालेवाडी येथे मतमोजणी ! निकालासाठी जाणारे कार्यकर्ते आणि सामान्यांसाठी महत्वाची अपडेट, वाहतूक मार्गात मोठा बदल, जाणून घ्या
– महत्वाची बातमी ! नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार