Dainik Maval News : आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणाऱ्या पायी वारीतील श्री संत तुकाराम महाराज यांच्या 340 व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. श्री देहू संस्थान, प्रशासन आणि पालखी सोहळा समिती यांच्यात सातत्याने नियोजनात्मक बैठका पार पडत असून पालखी सोहळा निर्विघ्न पार पडवा यासाठी सुक्ष्म नियोजन केले जात आहे.
नुकतीच पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंदिराच्या दर्शन सभागृहात आढावा बैठक पार पडली. उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली या पूर्व नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस डॉ.माने, तहसीलदार जयराज देशमुख, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज गोसावी तसेच सर्व विभागाचे शासकीय अधिकारी, पदाधिकारी, प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
- वारकरी चालत जाणाऱ्या देहूरोड पालखी मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, नियमबाह्य आणि अनावश्यक असलेले गतिरोधक काढावेत, असा मुद्दा देहू देवस्थान संस्थानने उपस्थित केला. यावर पालखीपूर्वी लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे बुजवणे, साईट पट्टे भरून घेणे अशी कामे केले जातील असे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले आहे.
देहू ते देहूफाटा (येलवाडी) दरम्यान असल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवून त्वरित डागडुजी करून घ्यावी, अशी सूचना माने यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. पालखी मार्गावर पहिली अभंग आरती अनगडशहावली बाबा दर्ग्याजवळ कापूर ओढा पुलावरील तुटलेले कठडे दुरुस्त करणे, वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठा ,शुद्ध पाणीपुरवठा या संदर्भातील प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आले.
अखंड विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा व्यवस्थापन करणे, आरोग्याच्या दृष्टीने संसर्गजन्य परिस्थिती पाहता त्याच्या उपाययोजना, औषधोपचार करणे ,स्वच्छता व कचरा व्यवस्थापन करणे,सोहळा मार्गस्थ होताना पालखी रथ व वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी व शासकीय विभागाने समन्वय साधून रस्त्या वरील खड्डे त्वरित बुजवणे, दुतर्फा मुरूम टाकणे, अचानक उदभवणाऱ्या आपत्ती काळात पूर्वनियोजन करणे, सुरक्षितच्या दृष्टीने वाहतूकीचे ,मुक्काम स्थळी विद्युत व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे,पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त लावणे ,सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे,नियंत्रण कक्ष तयार करून सर्व विभागातील अधिकारी,पदाधिकारी कर्मचारी यांचे नियोजन करण्याबाबतच्या सूचना यावेळी संबंधित विभागाला उपजिल्हाधिकारी डॉ यशवंत माने यांनी यावेळी दिल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक पर्यावरण दिन । राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश
– महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय!