Dainik Maval News : पवना धरणग्रस्तांना घरासाठी प्रति खातेदार तीन गुंठे जागा शासनाने देऊ केली. परंतु अनेक खातेदारांनी तीन गुंठे जागेपेक्षा अधिकची जागा कब्ज्यात घेतल्याच्या तक्रारी आहेत. प्रतिखातेदार 3 गुंठे जागा भूखंड म्हणून देण्यात आली, परंतु योग्य नियोजन न झाल्यामुळे अडचणी वाढल्या. त्यामुळे तीन गुंठेपेक्षा अधिकची जागा खातेदारांनी स्वतःहून मोकळी करावी अन्यथा ते अतिक्रमण म्हणून गृहीत धरले जाईल, असे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले.
तहसीलदार देशमुख यांनी मंगळवारी (दि.25) पवन मावळ विभागातील ठाकुरसाई गावातील पुनर्वसन गावठाणची पाहणी केली. यावेळी पुनर्वसन गावठाण भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजावून घेतल्या.
पवना धरणात जलसाठा झाल्यावर धरणग्रस्तांनी धरणाच्या काठावर पुनर्वसन केले. परंतु तेव्हा घर एकीकडे व सातबारा दुसरीकडे अशी परिस्थिती होती. तत्कालीन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे १९६८ व १९७० असे दोनदा प्रशासकीय आदेश काढल्याने घर एकीकडे व सात बारा दुसरीकडे अशी गोंधळाची परिस्थिती झाली होती, याबाबत काही खातेदारांनी प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील केले. यावर सुनावणी होऊन १९७० चे आदेश कायम केले गेले.
यावर तहसीलदार यांना सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार दिले गेले. त्यानुसार तहसीलदार यांनी १९७०च्या आदेशानुसार निकाल दिला आहे. मंगळवारी (दि.२५) प्रत्यक्ष गावठाणात पाहणी करून येथील धरणग्रस्त खातेदारांच्या अडचणी समजावून घेतल्या. पुढील आठवड्यात प्रशासकीय कमिटी अतिक्रमणाबाबत चौकशी करून अहवाल देईल व अहवाल पाहून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा