Dainik Maval News : पवना धरणात सद्यस्थितीत २८.२७ टक्के इतका पाणीसाठा आहे. मे महिन्यात झालेल्या दमदार अवकाळी पावसाने पवना धरणाच्या जलसाठ्यात तीन ते चार टक्क्यांची वाढ झाली होती. धरणातील पाणीसाठा २६ हून २९ टक्क्यांवर गेला होता. परंतु धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून पुन्हा धरणातील पाणीसाठा घटू लागला आहे.
पवना धरणातील पाण्यावर मावळ तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीयोजना, लहान मोठे अनेक व्यवसाय आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक अवलंबून आहेत. उद्योगनगरीसाठी तर पवना धरण हा पाण्याचा प्रमुख जलस्त्रोत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस वातावरण कोरडे राहू शकते, तर मान्सूनला काहीसा ब्रेक मिळाला आहे. यामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. दुसरीकडे धरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार पवनातील पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवला जाऊ शकतो. परंतु नागरिकांनी काटकसरीने पाणीवापर करणेही गरजेचे आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway