Prime Minister Narendra Modi Meditation : काल (दि. 30 मे) लोकसभा निवडणूक 2024 च्या अंतिम टप्प्यातील प्रचाराची सांगता झाली. तब्बल दीड महिन्यांपासून देशात लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार ४०० पार’ आणि ‘ये मोदी की गॅरंटी है’ अशा घोषणा देत पाच पन्नास नाही तर तब्बल 206 सभा घेतल्या. आता या सभा आणि प्रचाराच्या सांगतेनंतर पंतप्रधान मोदी ध्यानधारणेसाठी बसले आहे, तेही थेट 45 तासांसाठी. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा लोकसभा निवडणूकीत जोरदार प्रचार केला. यादरम्यान त्यांनी 206 सभा आणि कित्येक रोड शो घेतले. सोबत 80 हून अधिक मुलाखती दिल्या. त्यानंतर शेवटच्या सभेआधीच ते ध्यान धारणा करणार असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानुसार पंतप्रधान मोदींनी ध्यान करण्यास सुरुवात केली आहे. ( Prime Minister Narendra Modi meditation at Kanyakumari Rock Memorial )
पंतप्रधान मोदी हे कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानाला बसले आहेत. गुरुवारी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी ध्यान करण्यास सुरुवात केली आहे. एकूण 45 तास मोदी ध्यान करणार आहेत. प्राप्त माहितीनुसार याकाळात मोदी मौन राहणार असून केवळ नारळाचं पाणी, द्राक्षांचा रस किंवा तत्सम पदार्थांचा आहार ते घेणार आहेत.
1 जूनच्या सायंकाळपर्यंत ध्यान केल्यावर मोदी तिथून थेट दिल्लीला रवाना होणार आहेत. मोदी ध्यान करणार असल्याने दोन दिवसांत प्रवाशांना कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यात बंदी घालण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
#WATCH | Tamil Nadu | PM Narendra Modi meditates at the Vivekananda Rock Memorial in Kanniyakumari, where Swami Vivekananda did meditation. He will meditate here till 1st June. pic.twitter.com/cnx4zpGv5z
— ANI (@ANI) May 31, 2024
Faith meets worship…
Glimpses from Prime Minister Shri @narendramodi‘s 45-hour long meditation session in Kanniyakumari. pic.twitter.com/Vvqxy02x4N
— BJP (@BJP4India) May 31, 2024
रॉक मेमोरियल –
कन्याकुमारीच्या रॉक मेमोरियल येथे ध्यान केल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी भारतासाठीचे आपले विचार व्यक्त केले होते. या जागेचा स्वामी विवेकानंद यांच्यावर फार प्रभाव पडला होता. कन्याकुमारीतील टेकड्यांचे विवेकानंद यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
अधिक वाचा –
– रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून खालापूरमध्ये मॉकड्रिल संपन्न । Raigad News
– मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून ‘प्रवीण ढमाले’ यांची नियुक्ती । Maval Lok Sabha
– गाडी चालवता येते पण पक्के लायसन्स नाही? आरटीओकडून जून महिन्यातील वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे