राज्यात खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांकडून शेतीची पेरणी आणि मशागतीचे कामे सुरु आहेत. अशात शेतीसाठी महत्वाच्या अशा कालखंडात काही बियाणे-खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत, या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक आदेत दिले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना हे निर्देश दिले. ( CM Eknath Shinde directed to take action against bogus seed sellers )
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे. बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकताहेत की नाही ते तपासावे. बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास अशांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता काटेकोर कारवाई करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशात म्हटले आहे.
अधिक वाचा –
– सततच्या पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शिंदे सरकारकडून 1500 कोटींचा निधी मंजूर
– महत्वाची बातमी! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध