Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक उत्सवानिमित्त तळेगाव शहरातील पाणीपुरवठा नगरपरिषदेने वेळेवर, नियमित अथवा दुबार सुरू करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून विशेषतः महिला वर्गाकडून होत आहे.
तळेगाव शहरात गुढीपाडव्याला ग्रामदैवत डोळसनाथ महाराजांचा उत्सव असतो. या उत्सवासाठी शहरातील विविध कार्यक्रम, उपक्रम व धार्मिक विधीमुळे नेहमीपेक्षा जास्त पाण्याची गरज ग्रामस्थांना असते. याशिवाय गुढीपाडव्याला येणाऱ्या पै पाहुण्यांसाठी पूर्वतयारी तसेच मराठी नवीन वर्षाचे स्वागत म्हणून साफसफाई आणि स्वच्छता यासाठी ही पाण्याची मोठी गरज असते.
- सध्या नगरपरिषदेकडून गावातील प्रत्येक विभागाला एक वेळ पाणी सोडले जाते. अलीकडच्या काळात विजेच्या लपंडावामुळे तसेच प्रशासनाकडून अवेळी पाणी येत असल्याने नागरिकांना भरपूर पाणी असूनही पाणी पुरेसे आणि नियमित मिळत नाही. त्यामुळे पाण्याविषयी अनेक तक्रारी सतत नगर परिषदेकडे येत असतात. मात्र याकडे काही अधिकारी हे गांभीर्याने पाहत नसल्याने महिला वर्गामध्ये संताप निर्माण होत आहे.
ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा वार्षिक उत्सव हा येत्या रविवारी असून उत्सवापूर्वी आणि उत्सवानंतर विविध कार्यक्रम आणि पै पाहुण्यांचे साठी पाण्याची गरज आहे. तरी नगर परिषदेने दुबार म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी पुरेशा पाण्याची व्यवस्था केल्यास महिला वर्गाकडून समाधान व्यक्त केले जाईल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान