वाढत्या महागाईच्या विरोधात आणि बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जनजागर यात्रेचे’ मावळ विधानसभेतील श्री क्षेत्र देहू, देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा या शहरांमध्ये मावळ राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात आले. तालुक्यात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी श्री क्षेत्र देहू येथून यात्रेला शुक्रवारी (6 जानेवारी) प्रारंभ करण्यात आला. ( NCP Nationalist Mahila Congress Jan Jagar Yatra Against Unemployment And Inflation Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाढत्या महागाईमुळे, बेरोजगारीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. परंतु सत्ताधाऱ्यांना याचे गांभीर्य नसून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यावर आवाज उठवण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी या विषयांवर आपली भुमिका मांडुन सर्वसामान्यांना जागरुक करायचे आहे. सावित्रीच्या लेकी महागाई विरोधात, बेरोजगारी विरोधात आवाज उठवून जागर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना बळ देण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. सत्ताधारी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सर्वांनीच मते व्यक्त करायला हवीत, असे आमदार सुनिल शेळके यांनी म्हटले.
यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्रीमती विद्याताई चव्हाण, प्रदेश निरीक्षक आशा मिरगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी तालुका अध्यक्ष गणेश ढोरे, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती बाबुराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, जि.नि. समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, कार्याध्यक्ष ओबीसी सेल अतुल राऊत, तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, ॲड. रुपालीताई दाभाडे, शितल हगवणे, पुष्पा घोजगे, संध्या थोरात, भिकाबाई वाघमारे, वर्षाताई नवघणे तसेच सर्व शहरांचे अध्यक्ष, नगरसेवक, स्थानिक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा –
– व्हिडिओ – शिंग्रोबाचीच कृपा, बोरघाटात ब्रेक फेल झालेली बस झाडाला अडकली, 64 विद्यार्थी बचावले
– मुळशी संघर्ष समितीकडून तहसीलदारांना स्मरणपत्र; अल्टिमेटम संपला तर भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरली