व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 19, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘त्यांना माहितीये आपलं नाणं चालणार नाही..शरद पवार हेच खणखणीत नाणं..जे गेलेत त्यांची चिंता करु नका..’, वाचा शरद पवारांचे संपूर्ण भाषण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन बैठका आज (दिनांक 5 जुलै) मुंबईत झाल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 5, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
sharad-pawar

Photo - Dainik Maval Graphics Team


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन बैठका आज (दिनांक 5 जुलै) मुंबईत झाल्या. यातील एक बैठक ही अजित पवार यांच्या नेतृत्वात झाली तर दुसरी ही शरद पवार यांच्या नेतृत्वाच यशवंतराव चव्हाण सेंटर इथे झाली. अजित पवार आणि अन्य सोबत गेलेल्या सर्व नेत्यांनी केलेल्या विधाने आणि आरोपांचा शरद पवारांसोबतच्या नेत्यांनी समाचार घेतलाच. परंतू स्वतः शरद पवार यांनीही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी बोलताना अनेक मुद्द्यांवर सखोल भाष्य केले. ( NCP Sharad Pawar full speech Yashwantrao Chavan Center Mumbai 5 July 2023 )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शरद पवार नेमके काय म्हणाले? पाहा संपूर्ण भाषण…

  • ५ जुलै ही आजची एक ऐतिहासिक बैठक आहे.
  • संपूर्ण देशाचे लक्ष या बैठकीकडे आहे.
    २४ वर्षांपूर्वी याच मुंबईत राष्ट्रवादीचा जन्म झाला.
  • राष्ट्रवादीची राज्यातील कानाकोपऱ्यात फळी उभी राहिली.
  • राष्ट्रवादीने अनेक नेते तयार केले.
  • सर्वसामान्य कार्यकर्ता नेता बनला आणि राज्य चालवू शकतो, हे दिसले.
  • आज आपल्याला आणखीन पुढे जायचंय.
  • संकटे खुप आहे. देशाची सुत्र अशांच्या हातात ज्यांच्याकडून देशाचं भलं होणार नाही.
  • देशातील आज चित्र बदललंय. संवाद संपलाय. लोकशाहीत विरोधक असो किंवा अन्य संवाद पाहिजे.
  • मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा सामान्य माणसांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संवाद ठेवायचो.
  • आज देशात हा संवाद नाही. आम्ही सर्व सत्ताधारी पक्षात नाही, पण लोकांमध्ये आहोत.
  • त्यामुळे देशाच्या जनतेत एकप्रकारची अस्वस्थतात आहे.
  • दुसरीकडे आम्ही एका बाजूला प्रयत्न सुरु केलेत, जिथे देशातील लोकशाही टिकवायची असेल संवाद सुरु ठेवायचा असेल, तर त्यासाठी पहिला प्रयत्न म्हणून विरोधी पक्षांची मोट बांधायला सुरुवात केलीये.
  • आणी आम्ही हे सुरु केल्यावर ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्यामध्ये अस्वस्थत पसरू लागली.
  • पंतप्रधांनानी आठवड्यापूर्वी भोपाळमध्ये बोलताना सांगितले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला.
    राज्यकर्त्यांनी आधाराशिवाय भाष्य करु नये.
  • पंतप्रधानांनी एकदा बारामतीत आल्यावर बोलले होते की देश कसा चालवायचा हे मी पंतप्रधानांकडून शिकलो.
  • त्यानंतर प्रचाराला आले तेव्हा शिविगाळ केली. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांनी बोलताना काळजी घ्या.
  • बेछूट आरोप करुन चालत नाही. जर चुक असेल कारवाई करावी. पण ठिके त्यांनी ती धमक दाखवली नाही.
  • ते देशाचे नेते आहेत. त्यांनी देशाचे नेते म्हणून मर्यादा पाळणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका भ्रष्ट वाटत असेल तर कालच्या शपथविधीत त्यांना का घेतले?
  • याचा अर्थ हे पाहिजे ते बोलतात. आधार नसेल ते बोलतात. आणि जनमाणसात गैरसमज पसरवतात.
  • सत्ताधारी पक्षातील आमदार खासदार आम्हाला खासगीत अनेक गोष्टी बोलतात. इंदिराजी, राजीवजी, नरसिंहराव यांच्या अनेकांच्या कार्यकाळात बघितले. तेव्हा खासदारांची बैठका होत असे. पण आज संवाद संपला.
  • हा देश आपल्या मुठीत चालवू शकतो, असा प्रकाड घडत आहे.
  • महाराष्ट्रात काही लोकांनी बाजूला जायची भुमिका घेतली, माझी तक्रार नाही. दुःख आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले, पक्षाने कष्ट घेतले. त्यांना विश्वासात घेतले नाही. आणि ज्यांच्या सोबत नको तिथे जाऊन बसले.
  • तुम्ही सांगता राष्ट्रवादी म्हणजे आम्हीच.. उद्या कुणीही असे सांगेल.. अशा प्रकारचे बोलणे आणि सभा घेणे हे योग्य नाही, हे लोकशाहीत अपेक्षित नाही.
  • आम्ही जेव्हा नवीन पक्ष काढायचं ठरवलं तेव्हा टिळक भवन सोडून टाकले.
  • आजकाल पोलिसांची मदत घेऊन सांगता… घड्याळाची खुण कुणाची हे संपूर्ण देशाला माहिती आहे. निवडणूक आयोगाने कुणाला दिली माहिती आहे.
  • पण मी सांगतो कोण कुठे जात नाही.
  • आम्ही आजवर घड्याळ, पंजा, गाय वासरू अशा अनेकांवर लढलो.. पण जर कुणी सांगत असेल आम्ही चिन्ह घेऊन जाऊ.. तर चिन्ह कुठे जात नाही. पण जोवर सामान्य माणसांच्या मनात पक्षाची प्रतिमा सखोल आहे, तोवर चिंता करण्याचं कारण नाही.
  • अनेकजण आज बोलले, म्हटले ‘ते आमचे गुरु आहेत’. तिथे सर्वात मोठा फोटो होता माझा. त्यांना माहितीये आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे जे चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. त्यांचं नाणं चालणारं नाही, जे खणखणीत आहे, तेच घेतलं पाहिजे, हे त्यांना माहितीये.
  • पांडुरंग बडव्यांनी घेरलाय… पांडुरंगाच्या दर्शनाला भेटायला जायची काही अडचण नाही… पंढरपूरात जाऊन अनेकांना पांडुरंग भेटत नाही.. कळसाचं दर्शन घेतात.. पांडूरंग म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणायचं.
  • भुजबळ — जेलमध्ये गेले होते. मला अनेकांनी सांगितलं होतं, संधी देऊ नका. पण संधी दिली. तिकीट दिली, निवडून आले आणि नंतर मंत्रीपदाची संधी दिली.
  • भुजबळ — म्हटले बघून येतो म्हटले आणि शपथ घेऊन आले.
  • राज्यकर्ते असे असावेत ज्यांनी राज्य एकत्रित ठेवावं. राज्यात आज एक उपमुख्यमंत्री आहेत, भाजपाचे आहेत.
  • ज्यांनी विदर्भ वेगळं करण्यासाठी आरोळ्या ठोकल्या. आज विदर्भकडे दुर्लक्ष केलंय.
  • आज आपले काही सहकारी गेले, अस्वस्थ आहोत.
  • दहा दिवसांपूर्वी सांगितलं कि असल्या मुख्यमंत्र्यासोबत काम करावं लागतंय. आणि त्यांच्यासोबत गेलेत.
  • पुलोदचा प्रयोग केला. तेव्हा सर्वांनी मला नेतृत्व करायला सांगितलं. तेव्हा जनता पक्ष होतं. तेव्हा असं सरकार देशात अनेक ठिकाणी असे सरकार आले होते. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात सर्वत्र असे पक्ष सरकार होते.
  • नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत. तो भाग हा विरोधी देशांच्या सीमा असणाऱ्या आहेत.
  • तिथे त्या परिस्थितीचा विचार करुन निर्णय घ्यावा लागतो.
  • तिथे बाहेरून पाठिंबा दिलाय. इथे ते उदाहरण योग्य नाही.
  • भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आम्ही गेलो हे सांगतात, .. पण जे जे भाजपाबरोबर गेले तिथे इतिहास आहे. तिथे सरकार चाललं नाही.
  • तिथे पक्षांची एकजूट उद्धवस्थ करण्याची कामे झाले. तेलंगणा, बिहार, आंध्र, हरियाणा, पंजाब इथेही तेच झालं.
  • चर्चा करुन गेले असते तर चांगलं झालं असंत. पण लक्षात घ्या बाहेर जे झालं तेच इथे होणार.
  • तुम्ही भाजपासोबत गेलात, तसेच शिवसेनासोबत गेलेत. आणिबाणी नंतर शिवसेनेने एकही उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा दिला होता.
  • तेव्हाही काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
  • शिवसेनेचं हिंदुत्व हे अठरापगड जातीला सोबत घेऊन जाणारं आहे. भाजपाचं हिंदुत्व विखारी आणि माणसां माणसांत नातं बिघडवणारं आहे.
  • आपल्या राज्यात काही दिवसांपूर्वी दंगली झाल्या. यात कोण होतं हे देशाला माहितीतीये. जिथे आपली सत्ता नाही तिथे तिथे समाजात विद्वेष वाढवायचा हे भुमिका भाजपाची तिथे आहे.
  • जे राष्ट्रप्रेमी नाहीत त्यांच्या सोबत आम्ही जाणारच नाही.
  • देशात आज महागाई, बेकारी, महिलांवरील हल्ला असे अनेक प्रश्न आहेत.
  • ज्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, त्यांच्याबद्दल काय बोलणार.
  • या लोकांना सत्तेपासून दूर करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीशाली करणे हाच अजेंडा आहे.
  • आज किती आमदार कुणाकडे आणि काय याच्या खोलात जाणार नाही.
  • जे गेले त्यांची चिंता करु नका. त्यांना सुखाने तिकडे राहुद्या. जोवर आपण एकत्र आहोत, यातून एक नवीन कर्तृत्वान पिढी घडवू.
  • सुरेश भट यांच्या ओळी आठवतात…
    “उषःकाल होता होता, काळरात्र झाली…. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली”

अधिक वाचा –
– “दादांनी आम्हाला विश्वासात घेऊन स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याला सरकारमध्ये सामील व्हावं लागणार आहे” – सुनिल शेळके
– महत्वाची बातमी! राष्ट्रवादीचे किती आमदार अजितदादांसोबत आणि किती आमदार शरद पवारांसोबत? पाहा संपूर्ण यादी

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्री शिवनेरी बसचा अपघात! 7 जण जखमी, केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यात यश

Next Post

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, 13 तालुक्यात 241 दुकानांसाठी जाहीरनामा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Distribution-of-Ration-Grains

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, 13 तालुक्यात 241 दुकानांसाठी जाहीरनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Photo Heavy rain in Vadgaon Maval city

PHOTO : पाणीच पाणी चहूकडे… वडगाव मावळ शहराला मुसळधार पावसाने झोडपले । Vadgaon Maval Rain

June 19, 2025
Ashadhi-Wari

महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा

June 19, 2025
Temporarily close dangerous tourist spots prioritize safety of tourists State Chief Secretary instructions

धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश

June 19, 2025
Pavana Dam

पवना धरण परिसरात जोरदार पाऊस, धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ । Pavana Dam Rain Updates

June 19, 2025
Heavy rain in Lonavala As much as 233 mm of rain recorded in a single day

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 221 मि.मी. पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

June 19, 2025
Veteran writer Padmashri Aranyarishi Maruti Chitampalli Passes Away

अरण्यऋषी हरपला… ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन । Maruti Chitampalli Passes Away

June 18, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.