Dainik Maval News : देहूगाव परिसरात एका शेतकऱ्याच्या शेतातील कांदा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी शेतकऱ्याच्या शेतातील कांद्याच्या गोण्या म्हणजे साडेपाच क्विंटल कांदे चोरून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकाराने परिसरातील शेतकरी चिंतातूर आहेत.
देहू परिसरातील शेतकरी अंकुश दामोदर हगवणे यांनी शेतातील काढणीस आलेले कांदे काढून कांद्याची पोती भरून शेतात रास लावून ठेवली होती. दरम्यान सोमवारी (दि.३१) रात्री विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्याचवेळी परिसरात विज नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सुमारे साडेदहा हजार रुपये किमतीचे साडेपाच क्विंटल कांदे चोरून नेले.
सध्या हवामान खात्याने मुसळधार पाऊस व गारपिटीचा इशारा दिला असल्याने शेतकरी शेतातील काढणीस आलेली पिके काढून घेत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी कांदा पीक काढून त्याची रास शेतात लावत आहेत. अशात चोरटे थेट शेतातून पीक लंपास करीत असल्याने शेतकरी हवालदिव असून अशा भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News