व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 16, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha

'पितर म्हणजे कोणी भूत नसतात तर ते आपलेच पुर्वज असतात. आपण आज जे काही आहोत ते त्यांच्याच मुळे आहोत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 8, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Pitru-Paksha

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पितृपक्ष आला की कावळा – पितर हा चर्चेचा विषय होतो. अनेकांना यातील शास्त्र काय आहे हे माहित नसते. त्यामुळे ते याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. अनेकजण या गोष्टीची टिंगल देखील करताना दिसतात. त्यामुळे पितृपक्षात श्राद्ध का करतात, या मागचे खरे कारण काय आहे? हे सर्व समजून घेण्यासाठी हिंदू धर्मातील मुळ संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत.

सनातन धर्मातील श्रध्देप्रमाणे “आत्मा” हा परमेश्वराचाच अंश आहे. जेव्हा या आत्म्यास त्याच्या या मूळ स्वरूपाचे विस्मरण होते तेव्हा त्यास “जीवात्मा” म्हणजे जीव ही संज्ञा प्राप्त होते. या अज्ञानामुळे जीवात्मा “पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्। असे म्हणत या संसार सागरात अनेक म्हणजे 84 लक्ष योनीतुन फिरत रहातो. “या जन्ममृत्युच्या चक्रातुन सुटका करुन घेणे म्हणजे मोक्ष प्राप्ती होणे. जोपर्यंत जीवाला मोक्ष मिळत नाही तो पर्यंत त्यास 84 चा हा फेरा चुकलेला नाही.

  • अनेक प्रकारच्या योनीतुन फिरत फिरत जेव्हा जीवास मनुष्य जन्म प्राप्त होतो तेव्हा त्यास त्याच्या विहित कर्माच्या संचितावरुन भोग प्राप्त होतात. आपला जन्म कोणाच्या पोटी होणार हे आपल्या पुर्वजन्माच्या कर्मावरच ठरत असते. ज्या कुळात म्हणजे घराण्यात आपला जन्म होतो, त्या प्रमाणे आपणांस गोत्र प्राप्त होते. आपला जन्म होण्यास दोन कुटुंबाची म्हणजे वडीलांचे आणि आईचे असे दोन भिन्न गोत्रातील कुटुंबीय कारणीभूत असतात. वडीलांचे जे गोत्र तेच मुलांस प्राप्त होते तोच त्याचा वंश असतो.

या दोन्ही कुटुंबातील म्हणजे आईचे माहे व वडीलांचे कुटुंबातील एकुण तिन पिढ्यांतील “आई – वडील”, “आजोबा – आजी”, “पंजोबा – पणजी” व त्यांचे कुटुंब हे आपले पितृ म्हणजेच पितर समजले जातात. यात जीवंत / हयात व्यक्तींचा समावेश केला जात नाही.

पितर हा शब्द “पितृ” संस्कृत या शब्दाचे रुप आहे. प्रत्येक जीवास मृत्युनंतर त्याच्या कर्म गतीप्रमाणे स्वर्ग वा नरक व पितृलोक या स्थानी काही काळ रहावे लागते. शास्त्रामध्ये सात प्रकारचे स्वर्ग आणि 7 प्रकारचे नरक असे 14 लोक सांगितले आहे. गायत्री मंत्र म्हणताना त्यातील उर्ध्वलोकांचे उच्चारण केले जाते. भूलोक, भूवलोक, जनलोक, तपलोक इ. आपण जेथे राहतो ती पृथ्वी म्हणजे भूलोक. या लोकावर भूव: लोक म्हणजे पितृलोक आहे. पितृपक्षात यालोकी राहत असलेले पितर आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भूलोकात येतात असा समज आहे.

गरूड पुराण आणि कठोपनिषदामध्ये या लोकाचे वर्णन केले आहे. याचे स्थान चंद्राचा जवळ उर्ध्वबाजूस सांगितले आहे. मनुष्याचा गती प्रमाणे त्यांना वेगवेगळ्या लोकात काही काळ रहावे लागते. जेव्हा जीवात्मा त्याचा विहित कार्यकाळ पूर्ण करुन मृत्यु पावतो. तेव्हा त्याच्या गतीप्रमाणे त्यास लोक प्राप्त होतो. परंतु जीवात्मा हा काही वेळा अपघात, आघात, आत्महत्या सारख्या कारणांमुळे अकाली मृत होतो तेव्हा त्यास काही काळ भटकावे लागते. त्यास पुढील गती मिळणे गरजेचे आसते. भटकण्यातून पुढील गतीसाठी तो त्यांच्या वंशातील वंशजाकडे आशेने बघत असतो.

जीवाचे मृत्युनंतर काय होतो? यावर प्राचीन भारतीय ऋषींनी ध्यान, चिंतन करुन संशोधन केले. त्यांच्या दिव्यज्ञानातुन त्यांना पुढील जीवात्माचा प्रवास लक्षात आला. त्याचे वर्णन अनेक पुराणांत आणि उपनिषदांमध्ये दिले आहे. त्यानुसार त्यांनी काही कर्मे शास्त्रात नमुद केली आहेत. ‘प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर देव, पूर्वज आणि ऋषींचे ऋण असते. श्राद्ध केल्याने पितरांच्या ऋणातून मुक्ती मिळते. ती त्यांनी त्याच्या जन्मात फेडलीच पाहिजेत असा दंडक आहे.’ त्यासाठी श्राद्ध हा विधी सांगितला आहे. श्राध्दाचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. पंचागामध्ये कोणत्या तिथीस कोणते श्राद्ध करावे हे सांगितले आहे.

पितृलोकात राहणाऱ्या आपल्या वंशातील सर्व पितरांना पुढील गती मिळवुन देणे हे आपले कर्तव्य असते. आपल्यावर त्यांचे ऋण असते. त्यासाठी आपण नैमित्यीक कर्माद्वारे, तर्पणाव्दारे, श्राध्दाद्वारे फेडले पाहिजे. जर आपण पितृ लोकात रहाणाऱ्या आपल्या पितरांसाठी अन्न म्हणजे पिंडदान केले नाहीतर, ते कष्टी होतात. त्यांना त्रास झाला तर ते आपल्याला पितृदोष निर्माण होण्यास निमित्त होतात. अनेक जन्मकुंडलीमध्ये पितृदोष सांगितला जातो. त्यासाठी त्रिपिंडी गया श्राद्ध हे उपाय करावे लागतात.

  • यंदा दिनांक सोमवार, दि. 8 सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरु होत आहे. या काळात आपण ज्यांचे वंशज आहोत. आपल्यात ज्यांचा “डीएनए” आहे, अशा आपल्या पूर्वजांना ते जिथे असतील तिथे सुख लाभो या भावनेने आपण केलेले कृत्य हे महालय श्राध्द म्हंटले जाते. आपल्या पूर्वजांविषयी पुज्य भाव ठेवून प्रत्येकाने मनोभावे त्यांना उत्तम गती लाभावी आणि आपल्या कुंटुबाला त्यांनी आशीर्वाद द्यावेत, यासाठी या पितृपक्षात त्यांच्या नावाने एक दिवस उपासना करण्यास काहीही गैर नाही.

वर्षश्राध्द आणि महालय श्राद्ध वेगवेगळे विधी आहेत. वर्षश्राध्द करतो म्हणून पितृपक्षात काहीही विधी न करणारे काही जण असतात. वर्षश्राध्द हे एका विशिष्ट व्यक्तीचे असते. तर पितृपक्षात पितरांचे श्राद्ध असते. त्यामुळे ही दोन्ही श्राद्ध केली पाहिजेत. पितर हे कोणी भूते नसतात तर ते आपलेच पुर्वज असतात. आज आपण जे काही आहोत ते त्यांच्याच मुळे आहोत त्यामुळे प्रत्येकाने या काळात देवाकडे प्रार्थना करुन पितृलोकात रहाणाऱ्या आपल्या सर्व पितरांना त्यांच्या पुढील गती मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. अशात विधी असे काही नसते. त्या मागील भावना ही उदात्त आहे.

भारतीय संस्कृतीत मानवीमूल्ये किती विचारपूर्वक स्थापन केली आहेत. हे आपल्या लक्षात येते. जर आपण पितरांना गतीृसाठी विधी करत असू तर आपल्या हयात सगोसोयऱ्यांसाठीही किती भावनाप्रधान असू याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुरlणातील कथेनुसार “भगीरथाने” आपल्या पूर्वजांच्या उध्दारासाठी प्रत्यक्ष गंगा स्वर्गातुन पृथ्वीवर अथक प्रयत्न करुन, अनेक वर्ष तपाचरण करुन अवतरीत केली. आपण निदान आपल्या पूर्वजांसाठी एक दिवसाचा श्राध्दविधी का करु नये?

लेखक – अजित दि. देशपांडे (भारतीय विद्यापारंगत, संतविचार अध्यासन)

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई ; पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश
– जी.एस.टी. कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मिळणार चालना ; पाहा कर कपातीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे
– महसूल विभाग १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’ राबविणार


dainik maval jahirat

Previous Post

कौतुकास्पद ! डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या कडून लोणावळा येथे निर्माल्य संकलन अभियान । Lonavala News

Next Post

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती उत्साहात; रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Celebrating the 234th birth anniversary of the revolutionary hero Raje Umaji Naik

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती उत्साहात; रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील - मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon-MIDC-Police-Station

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजित जाधव यांची बदली, संतोष पाटील यांनी स्वीकारला पदभार । Maval News

October 16, 2025
Accident

भीषण अपघात ! लोणावळ्यात भरधाव हायवा उलटल्याने चालकाचा मृत्यू, वलवण एक्झिट येथे अपघात । Lonavala Accident

October 16, 2025
Vadgaon-Nagar-Panchayat

अर्धवट किंवा पुरावे नसलेले हरकत अर्ज विना कार्यवाही निकाली काढणार – मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम

October 16, 2025
Heavy vehicle traffic continues in Lonavala city Collector orders SP instructions ignored by Driver

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच

October 16, 2025
Forts-In-Maharashtra

शिवछत्रपतींच्या १२ दुर्गांना मानवंदना देण्यासाठी जनसहभागाचे आवाहन – वाचा अधिक

October 16, 2025
Ajit Pawar inaugurates district-level Chief Minister Relief Fund Cell Citizens of Pune district will benefit

पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

October 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.