Dainik Maval News : 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या पवना बंद जलवाहिनी विरोधी आंदोलनात शहीद झालेल्या तीन शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक येळसे येथील स्मृती स्थळी येतात. परंतु, 2013 पासून आजपर्यंत ज्या ठिकाणी हे आंदोलन झाले होते, त्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आंदोलनस्थळी शिवसेना मावळ परिवाराकडून शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शुक्रवारी देखील 9 ऑगस्ट क्रांती दिनी पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी आंदोलनात मावळ गोळीबार प्रकरणात शहीद झालेल्या ३ शेतकरी बांधवांना शिवसेना मावळ परिवाराकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, मावळ तालुका समन्वयक अनिल ओव्हाळ, माजी सरपंच अनिल भालेराव, शहर प्रमुख सुरेश गुप्ता, सनी मोहिते, माजी उप सरपंच शाम बाबू वाल्मिकी, सदानंद पिलाने, सुनिल इंगुळकर, सतीश गोंते, अजय ढम आदी उपस्थित होते. ( Shiv Sena Maval Parivar pays tribute to farmers martyred on Expressway )
पक्षात कोणतीही गटबाजी नाही – खराडे
क्रांतीदिनी एक्सप्रेस वे आणि येळसे या दोन ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्हीकडे स्वतंत्र श्रद्धांजलीचे कार्यक्रम आयोजित केल्याने मावळ तालुक्यात शिवसेना उबाठा पक्षात गटबाजी असल्याचे, दोन स्वतंत्र गट असल्याची चर्चा होऊ लागली होती. परंतु आमच्या पक्षात कोणतीही गटबाजी नसून मी स्वतः मागील 11-12 वर्षे शहीद शेतकऱ्यांना या ठिकाणीच श्रद्धांजली वाहतो. एक दोन वेळा सोडल्यास येळसे येथील कार्यक्रमाला कधी गेलो नाही, त्यामुळे हे काही पक्षातील गटबाजीचे उदाहरण नाही, अशी भुमिका मच्छिंद्र खराडे यांनी दैनिक मावळकडे मांडली.
अधिक वाचा –
– तयारी विधानसभा निवडणूकीची : संपूर्ण पुणे जिल्ह्यात ८४ लाख मतदार ; पाहा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतील मतदारसंख्या । Vidhansabha Election 2024
– टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट येथील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पावर अजित पवारांचे विशेष लक्ष ; संबंधित विभागांना महत्वाच्या सुचना
– कार्ला ग्रामपंचायतीकडून 18 दिव्यांग बांधवांना अपंग कल्याण निधीचे धनादेश वाटप । Karla News