Dainik Maval News : मार्च महिना संपत आला असताना उन्हाच्या झळा आणखीन तीव्र झाल्या आहेत. सूर्य आग ओकत असून वाढत्या उष्म्यामुळे मनुष्यासह प्राणीमात्रांनाही प्रचंड त्रास होत आहे. अशात पोल्ट्री उद्योजकांना उन्हाच्या झळांमुळे पक्षी जगविताना, वाचविताना मोठी कसरत करावी लागत असून उष्माघाताने पक्षी मेल्यास नुकसानीची झळ सहन करावी लागत आहे.
- दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे कोंबड्या जगवायच्या कशा? असा प्रश्न पोल्ट्री उद्योजकांसमोर आहे. अनेक पोल्ट्री व्यवसायिकांनी उष्म्यापासून पक्ष्यांचे संरक्षण व्हावे यासाठी पोल्ट्री शेडमध्ये कुलर लावले आहेत. मावळ तालुक्यात जवळपास दोन हजार पोल्ट्री उद्योजक आहेत.
- शेती व्यवसायाला सोइस्कर जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करतात. मावळात गावरान कोंबडी पालन करणारेही अनेकजण आहेत. परंतु या सर्वांसमोर आता उन्हाच्या झळांपासून पक्षी वाचविण्याचे आवाहन आहे.
उन्हाची तीव्रता वाढीस लागल्याने कोंबडी उत्पादक धास्तावले आहेत. उन्हाचा पारा वाढल्याने उष्माघाताने कोंबड्या मृत पावण्याच्या घटना वारंवार होत आहेत. यामुळे हिवाळ्यात जसे थंडीपासून पक्ष्यांचे संरक्षण करावे लागते, तसेच आता उन्हाळ्यात गरमीपासून पक्ष्यांचे संरक्षण करावे लागत आहे.
उन्हाचा पारा पाळीशीच्या जवळ असल्याने पोल्ट्री शेडमधील पक्ष्यांच्या संरक्षणासाठी अनेक शेडधारकांनी कूलर, पंखे बसविले आहेत. यामुळे गारवा निर्माण होऊन उष्माघातापासून पक्ष्यांचा बचाव होत आहे. परंतु त्यामुळे विजबिलाचा खर्चही वाढत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान