पवन मावळ विभागातील हजारो शेतकरी आणि नागरिक यांच्यासाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेले, तसेच पिंपरी-चिंचवड शहरासाठी वरदान असलेले आणि पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेले पवना धरण आता आटू लागलेले आहे. वाढत्या उष्म्यामुळे धरणातील पाणीसाठा जलदगतीने घटू लागलाय. या सर्व परिस्थितीत पाण्याची काटकसर करणे आणि पाणी जपून वापरणे आवश्यक आहे, अन्यथा उन्हाळ्याच्या अंतिम दिवसात पाणी बाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. सद्यस्थितीत पवना धरणात 44.72 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. मात्र, पावसाळा लांबल्यास अडचणी वाढू शकतात. अशात अगोदरच चार वर्षांपासूव दिवसआड पाणीपुरवठा होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आणखी पाणीटंचाईस सामोरे जावे लागेू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. ( Only 44 percent water in pavana dam citizens of pcmc and maval need to use water sparingly )
सध्या पवना धरणात 44.72 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे, असे सांगितले जातंय. परंतू गेल्यावर्षी हाच पाणीसाठा 46.37 टक्के इतका होता. याचा अर्थ गतवर्षीपेक्षा 1.65 टक्क्याने यंदा पाणीसाठा कमी आहे. पण महत्वाची बाब म्हणजे पाणी कमी असले तरीही पाण्याची मागणी मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच पाण्याची नासाडी टाळणे, अनावश्यक वापर टाळणे आणि गरजेनुसार योग्य पद्धतीने पाणी वापरले तरच हा पाणीसाठा सर्वांसाठी पुरेसा ठरेल. अन्यथा पाणीबाणी होण्याची शक्यता अटळ आहे.
अधिक वाचा –
– अखेर वसंत मोरे यांना लोकसभेचे तिकीट मिळालेच, ‘या’ पक्षाकडून मोरेंना पुणे लोकसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर
– मोठी बातमी! पुढील दोन दिवसात मुंबई-पुणे प्रवास करणार असाल, तर ‘ही’ बातमी नक्की वाचा । Mumbai Pune Expressway News
– आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲपची सुविधा, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 278 तक्रारींवर कार्यवाही