Dainik Maval News : मुंबईच्या दिशेने जात असलेल्या प्रवासी बसला अपघातानंतर आग लागल्याची घटना मंगळवारी (दि.25) पहाटे द्रुतगती मार्गावर घडली. उर्से टोलनाक्याच्या पुढे ओझर्डे गावाच्या हद्दीत ही घटना घडली. या बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते, सुदैवाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
पोलिसांनी माहितीनुसार, कोल्हापूरहून निघालेली खासगी बस पहाटेच्या सुमारास वेगाने मुंबईच्या दिशेने जात होती. प्रवासी झोपेत असतानाच बस अचानक रस्ता सोडून बाजूच्या बॅरिगेटला धडकली. या अपघातामुळे बसमध्ये गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रसंगावधान राखत चालक आणि वाहकाने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सावधगिरीने खाली उतरवले. काही क्षणांत संपूर्ण बसने पेट घेतला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. आग भीषण स्वरूपात असल्याने तिला आटोक्यात आणण्यासाठी सुमारे अर्धा ते एक तास लागला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसचे नुकसान झाले आहे. शिरगाव पोलिस तपास करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
– ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी खासदार बारणेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे । Maval News