Dainik Maval News : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या माध्यमातून विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर आणि मावळ तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध कृषी उपक्रम राबविण्यात आले.
उपक्रमांतून कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात आली. अभियानात नावीन्यपूर्ण शेती करणे, भात सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, बांबू लागवड तंत्रज्ञान, माती परीक्षणाचे महत्व, शेतीमाल ब्रँडिंग व विक्री व्यवस्थापन, बियाणे खते, रोपे आणि विविध शासकीय योजना यांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. मार्गदर्शकांच्या पथकाने गावागावात जाऊन शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन मार्गदर्शन केले.
यात संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, आत्मा अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. मावळ तालुक्यातील मौजे माळवाडी, वडगाव, साते, नाणे, उर्से आणि तिकोणा या गावांमध्येही विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात आले. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी अधिकाऱ्यांचे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News