Dainik Maval News : मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नुकतीच खरीपाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेकडून करण्यात आली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २५ जून) मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन दिले आहे.
याप्रसंगी शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी भारत ठाकूर, उमेश गावडे, युवराज सुतार, रवींद्र गायकवाड, पोपट राक्षे, राहुल नखाते, प्रदीप सातपुते, भरत वाटाणे, समीर घारे, अभिषेक काळोखे, संतोष ढोरे, नितीन पिंगळे उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून खरीप भात पेरणी, भूईमूग, सोयाबीन, घेवडा, उडीद, मूग पिकांची पेरणी केली. काहींनी पारंपारिक बैलजोडीसह तर काहींनी ट्रॅक्टर घेऊन खर्च करून काम केले. दरम्यान १५ मे ते २५ जून दरम्यान झालेल्या पावसात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, असे निवेदन तहसीलदार देशमुख यांच्याकडे देण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके