Dainik Maval News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात आयआयटी मुंबईच्या 3 तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
मुंबईहून लोणावळ्यात आल्यानंतर लोणावळ्यात सुर्योदय पाहिल्यावर हे विद्यार्थी पुन्हा मुंबईला परतत होते. एका कारमधून हे विद्यार्थी प्रवास करीत होते. द्रुतगती मार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांची कार एका कंटेनरच्या मागच्या बाजूला प्रचंड वेगाने धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारने रस्त्यावर अनेक कोलांटउड्या खाल्या आणि गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमकुमार नितीन बोरसे हा विद्यार्थी कार चालवत होता. मध्यम मार्गिकेतून गाडी चालवत असताना डाव्या बाजूच्या स्लो लेनमधील कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात घडला.
एका बस चालकाने या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. महामार्ग पोलिसांनी कटरच्या साहाय्याने गाडीचा पत्रा कापून अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणात हितेश कुमार मीना या विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संबंधित कंटेनरचा शोध घेत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना
