लोणावळ्यात व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात दोन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लोणावळ्यात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, गुन्हेगारीला आळा घालावा व हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, यासाठी भाजपच्या व्यापारी आघाडीच्या वतीने सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची भेट घेत कारवाईची मागणी करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, व्यापारी आघाडी अध्यक्ष अभय पारख, प्रदेश सदस्य आशिष बुटाला, प्रकाशराज चौहाण, कांतिलाल भंडारी, बाळासाहेब जाधव, प्रथमेश पाळेकर, ललित ओसवाल, हिरल जैन, श्रावण चिकणे आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. ( BJP demands from lonavala police to take strict action against culprits in case of beating up traders )
लोणावळ्यात गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिलेले नाही, शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. शहरात कायदा व सुव्यवस्था राखत गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. सततच्या हल्ल्यांमुळे व्यापारी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिक देखील सुरक्षित राहिलेले नाही. कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे व वारंवार गुन्ह्यांच्या घटना घडत आहे. याकरिता पोलिस यंत्रणेने याची दखल घेत हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अन्यथा लोणावळा बंद करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला.
अधिक वाचा –
– अखेर तो दिवस उजाडला! मावळ तालुक्याचं शेवटचं टोक असणाऱ्या कळकराई गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतोय रस्ता
– वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांनी घेतली आमदार शेळकेंची भेट; आमदारांनी दिला मोलाचा सल्ला!
– शेतात जाणारा रस्ता अडवलाय? थेट तहसीलदारांकडे करा तक्रार; प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असावा असा ‘मामलेदार कोर्ट कायदा’