Dainik Maval News : कासारसाई धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून मागील चोवीस तासांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. कासारसाई धरण शंभर टक्के भरले असून सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होतच आहे, अशा परिस्थिती धरणातील जलसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून नालापात्रामध्ये १३५ क्यूसेक्सने सुरू असणारा विसर्ग वाढवून ३७० क्यूसेक्सने करण्यात आला आहे. पाऊस चालू राहिल्यास आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास परिस्थितीनुसार धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येईल, असे धरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar