मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून ( Maharashtra Karnataka Border Issue simavad ) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात मंगळवारी (6 डिसेंबर) बेळगावजवळील हिरेबागवाडी येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. याविरोधात सर्वच स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
महाराष्ट्रातही त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आज (बुधवार, 7 डिसेंबर) रोजी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावर निशाना साधत कर्नाटक सरकारलाही सुनावले. यादरम्यान बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धारेवर धरले. ( Maharashtra Karnataka Border Issue simavad Shivsena Sanjay Raut Challenge CM Eknath Shinde )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिल्लीचया पाठिंब्या शिवाय
बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाहीं.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.महाराष्ट्राचा
कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय.बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे.ऊठ मराठ्या ऊठ!— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2022
‘कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो. तुम्ही तर स्वत:ला भाई समजणारे मुख्यमंत्री आहेत ना? मग दाखवा ना आता कर्नाटकाला भाईगिरी, कसले भाई तुम्ही,’ असे म्हणत संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली.
क्रांती दिसत आहे.महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता.तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले . स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत.हा षंढ पणा आहे— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2022
‘तुम्ही कधी बेळगावात लाठ्या खाल्ल्या, याचा इतिहास दाखवा. नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला एक मिनिटही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, आज महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न अचानक उफाळला आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. ताबडतोब सरकारनं बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा, अन्यथा महाराष्ट्राला कठोर पाऊलं उचलावी लागतील, मग तुमचं सरकार खड्ड्यात गेलं तरी चालेल,’ असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला. ( Maharashtra Karnataka Border Issue simavad Shivsena Sanjay Raut Challenge CM Eknath Shinde )
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे जिल्ह्यासाठी मोठा निर्णय!
– आनंदाची बातमी! ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा पूर्ववत होणार