नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय भाजपासाठी महत्वाचा आहे, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात पार पडली. यावेळी बावनकुळे बोलत होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
व्यासपीठावर शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार अश्विनी जगताप, प्रशांत ठाकूर, उमा खापरे, पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच शरद बुट्टे पाटील, अविनाश कोळी, विक्रांत पाटील, बाळासाहेब पाटील आदी मान्यवर देखील उपस्थित होते. ( Maval Lok Sabha BJP Functionaries Meeting In Pune Chandrasekhar Bawankule Shrirang Barane Present )
- मावळ लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला मिळावा, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. महायुतीच्या जागा वाटपात मावळची जागा शिवसेनेकडेच कायम राहिल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका समजावून सांगितली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेची युती खूप जुनी आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे सर्वाधिक आमदार असूनही आपल्याला अडीच वर्षे विरोधात बसावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे धाडस व त्याग केल्यामुळे आपण महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आलो, हे कदाचित विसरून चालणार नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्याचे पालन करीत आपण सर्व मित्र पक्षांना एकत्र घेऊन काम करणे आवश्यक आहे.
मावळ लोकसभेचीच काय तर रामटेकची जागा देखील महायुतीत शिवसेनेला सोडली आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार चार सौ पार’ हे लक्ष्य निर्धारित केले आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही किंतू-परंतु मनात न ठेवता झोकून देऊन काम केले पाहिजे. मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मावळात धनुष्यबाण हे चिन्ह आहे, हे खरोखर जाऊन मतदारांना सांगा व खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून आणा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात रात्री अपरात्री गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांवर कारवाई; अश्लील हावभाव करून नाच करणाऱ्या नर्तिकांसह 10 जणांवर गुन्हे दाखल
– भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त मावळ तालुक्यात पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सन्मान । BJP Foundation Day
– देशभरातील पालकांसाठी महत्वाची बातमी! जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, बाळाच्या जन्म दाखल्यावेळी ‘ही’ माहिती द्यावी लागणार