Dainik Maval News : मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार मावळ यांना शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी मावळ तालुका काँग्रेस (आय) चे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले, कार्याध्यक्ष खंडूजी तिकोणे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा पुष्पा भोकसे आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘शासनाने अनेक उद्योगपतींना कर्जमाफी केली. अनेक सवलती दिल्या. परंतू, शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी दिली नाही. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे तसेच शेतीचे नुकसान झालेले आहे. शेती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचे रक्षण करणे शासनाचे कर्तव्य आहे. नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, महागाई, शेतीमालाल हमीभाव नसणे यामुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला आहे. तरी आपण मावळ तालुक्यातील शेती पिकांचे आणि फुटतुटीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात शासनाकडे अहवालसादर करावा,’ असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ( Maval Taluka Congress letter to Tehsildar regarding loan waiver and compensation of farmers )
यावेळी काँग्रेस प्रतिनिधी दिलीप ढमाले, सांस्कृतिक सेलचे सहादू आरडे, शांताराम नरवडे, विशाल वाळुंज, राजू शिंदे, रोहिदास वाळुंज, अनंता मोहोळ, संभाजी लेंडकर, रोहित नरवडे हेही उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News