Dainik Maval News । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही पवना धरण जलाशयाचे अर्थात पवनामाईचे जलपूजन करण्यात आले आहे. पवना धरण हे सध्या 86 टक्के भरले आहे. धरणात पाण्याची आवक सुरूच असून धरणातून 1400 क्युसेक विसर्ग देखील सुरू आहे. काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यात पवना धरण 100 टक्के भरले जाईल. मात्र ठाकरे गटाने शंभर टक्के धरण भरण्यापूर्वीच जलपूजन केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, माजी उप जिल्हाप्रमुख भरत ठाकूर, संघटक मदन शेडगे, युवासेना प्रमुख उमेश गावडे, उप तालुका प्रमुख युवराज सुतार, समन्वयक अनिल भालेराव, उप तालुका ग्राहक संरक्षण किशोर शिर्के, विभाग प्रमुख – उमेश दहिभाते, भरत भोते, उप विभाग प्रमुख – संतोष शिंदे, रंगनाथ सावंत, शाखाप्रमुख सुरेश गुप्ता, शंकर गोपाळे, कचरू गराडे, शंकर दळवी, उमेश ठाकर, सनी मोहिते यांच्या उपस्थितीत हे जलपूजन संपन्न झाले. ( Office bearers of Shiv Sena Uddhav Thackeray group performed water puja of Pavana Dam reservoir )
इतकी घाई का? याचीच चर्चा –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दरवर्षी पवना माईचे जलपूजन केले जाते, त्याप्रमाणे यंदाही जलपूजन करण्यात आले. तसे पाहता पवना धरणाचा जलाशय शंभर टक्के भरलेला नसतानाही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जलपूजन घाईघाईत का केले ? याची चर्चा होत आहे. शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचीही चर्चा होत आहे. तसेच यावेळी ठाकरे गटातील सर्व महत्वाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते, याचीही जोरदार चर्चा होत आहे.
अधिक वाचा –
– एकेरी वाहतूक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 160 वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई । Lonavala News
– वेहरगाव-दहिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अर्चना देवकर यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ । Karla News
– कणखर आवाज हरपला ! प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी यांचे निधन । Talegaon Dabhade