Dainik Maval News : भारताचे नंदनवन असणाऱ्या जम्मू काश्मीरच्या काश्मीर भागातील पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला. यात दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली असून यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
पाकिस्तानच्या या वृत्तीला आता ठेचलेच पाहिजे, अशा प्रकारच्या भावना देशभरातून उमटत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कामशेत येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक यांच्याकडून पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
कामशेतमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी नाागरिकांनी एकत्र येत हल्ल्याचा निषेध नोंदवित घोषणाबाजी केली. तसेच अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच, हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार