मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जतमध्ये दुपारुन जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही वेळ मतदान केंद्र बंद होते. त्यामुळे कर्जतमध्ये फेरमतदान घ्यावे. अन्यथा वेळ वाढवून देण्याची मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
निवेदनात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वादळी वारा व पाऊस पडल्यामुळे या भागातील विजेचे खांब पडले. घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर लाईट नसल्या कारणाने दोन ते तीन तास अनेक नागरिक मतदान करु शकले नाहीत.
त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीची चौकशी करुन त्या भागात फेर मतदान घेण्याची मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. ( Re-poll in Karjat demand by Shrirang Barane know reason maval lok sabha )
अधिक वाचा –
– कर्जतमध्ये फेरमतदान घ्या, श्रीरंग बारणे यांची मागणी, जाणून घ्या कारण
– मावळ लोकसभेतील उमेदवार संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांनीही बजावला सहकुटुंब मतदानाचा अधिकार । Maval Lok Sabha
– तब्बल 20 वर्षांनी पुन्हा भरली शाळा ! जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने एकविरा विद्यालयाचे प्रांगण पुन्हा गजबजले