Dainik Maval News : जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरणाच्या रक्षण आणि संवर्धनासाठी सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) च्या नेतृत्वाखाली आणि १९७३ पासून दरवर्षी ५ जून रोजी आयोजित केला जाणारा हा दिवस पर्यावरणीय प्रचारासाठी सर्वात मोठा जागतिक व्यासपीठ बनला आहे. जगभरातील लाखो लोक हा दिवस साजरा करतात.
तसेच नागरिकांनमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी, यासाठी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. वडगाव नगरपंचायत तर्फे जागतिक पर्यावरण दिननिमित्त माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत शहरातील ओपन स्पेस असलेल्या ठिकाणच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नगरपंचायचे मा. मुख्याधिकारी, सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी/कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
- यावर्षी नगरपंचायतचे 25000 देशी प्रजातीचे वृक्षारोपण करण्याचे उद्धीष्ट आहे यावेळी सर्वांना पर्यावरणातील होणारे बदल, वाढते प्रदूषण यांना आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याबाबत प्रेरित करण्यात आले. तसेच वसुंधरेला वाचविण्यासाठी एकल प्लास्टिक वापर करू नये, जास्तीत जास्त झाडे लावावे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे, विजेची व पाण्याची बचत करणे, शक्य होत असेल तर घरीच कंपोस्ट तयार करून त्याचा वापर करणे, सौरपॅनेल/सौरहिटर चा वापर करणे बाबत जनजागृती करण्यात आली
वृक्षवल्ली अन्य कोणी नसून आपलेच सोयरे म्हणजे नातेवाईक आहेत, ही जाणीव आमच्या संतांनी, संस्कृतीने फार आधीपासूनच आमच्या मनात खोलवर रुजवली आहेत. म्हणूनच तुळशीची पूजा, शंकराला बेल, वडाला प्रदक्षिणा, मंगलकार्यात केळीचे खांब, जेवणानंतर गोविंदविडा इ. वृक्षवल्ली अर्थात पर्यावरणाशी निगडित गोष्टी आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत.
- पृथ्वी आपले घर आहे. आपण जन्माला आल्यापासून ते मरणापर्यंत ही पृथ्वी आपले संगोपन करते आणि आपल्याला आपण बनलेली व्यक्ती बनवते. निसर्ग पोषक, प्रेमळ आणि आलिंगन देणारा आहे. हे आपल्याला जगण्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने प्रदान करते. शारीरिक आणि मानसिक निरोगीपणासाठी, निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम प्रदान करण्यासाठी परिपूर्ण आहे. मात्र, मानवजातीने निसर्गावर निर्दयीपणा दाखवला आहे. मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास केला आहे, जंगले तोडली आहेत आणि प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरले आहे.
आता वेळ आली आहे की आपण निसर्गाकडे वळावे आणि त्याचे जतन करण्यास सुरवात करावी. हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश