Dainik Maval News : पश्चिम बंगाल राज्यामध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश हे चिंतेचे कारण बनले असून पश्चिम बंगालचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने शनिवारी मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभाग मंत्री सोमनाथ दाभाडे, जिल्हा मंत्री महेंद्र असवले, प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे, तालुकाध्यक्ष अमोल पगडे, सहमंत्री आकाश वारुळे, सचिन शेलार, योगेश शेटे, प्रखंड मंत्री बजरंग कांबळे, दर्शन वहिले, भूषण वहिले, अनंता कुडे, अमोल ठोंबरे, किरण आचार्य, योगेश ढोरे, निखिल भांगरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात कोपरा सभा झाली. या सभेत सोमनाथ दाभाडे, महेंद्र असवले, राजश्री वाकचौरे आदींनी मनोगत व्यक्त करून, बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.
पश्चिम बंगालमध्ये वक्फ बोर्ड कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनात हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. तेथील हिंसाचाराची एनआयएमार्फत चौकशी करावी, दोषींना विनाविलंब कडक शिक्षा करावी, तेथील कायदा सुव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलाकडे सोपवावी, ममता सरकारने अडवलेले बंगाल व बांगलादेश दरम्यान असलेल्या ४५० किलोमीटर सीमेला तारेचे कंपाउंड करण्याचे काम त्वरित पूर्ण करावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार कार्यालयात देण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार शेळके, सहकारमहर्षी दाभाडे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद माळवाडी शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन
– मावळातील सर्व शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये शासनाच्या योजनांची माहिती देणारे फलक लावावेत ; तहसीलदारांना निवेदन
– लोणावळ्यातील श्रोत्यांसाठी व्याख्यानांची पर्वणी ; 21 एप्रिलपासून शहरात वसंत व्याख्यानमालेचे आयोजन । Lonavala News