स्वच्छ भारत अभियान हा केंद्र शासन व राज्य शासन यांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून, स्वच्छ भारत अभियान २.० ची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व कामगार यांची क्षमता बांधणी होणे अत्यावश्यक आहे. याकरिता नगरपंचायतने आवश्यक त्या सुविधा घनकचरा व मैला व्यवस्थापन संबंधित कर्मचारी यांची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत क्षमता बांधणी च्या अनुषंगाने राज्य अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांचेकडून मुख्याधिकारी, तांत्रिक कर्मचारी व सफाई कर्मचारी वर्ग या ३ स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.
त्याच अनुषंगाने बुधवारी, दि. ३ जुलै २०२४ रोजी वडगाव नगरपंचायत सभागृह मध्ये राज्य अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांचे मार्फत कुशाग्रा इनोवेशन फाउंडेशन, पुणे यांनी नगरपंचायत सर्व सफाई कर्मचारी यांना कार्यशाळे दरम्यान प्रशिक्षित करण्यात आले. यादरम्यान सफाई कर्मचाऱ्यांना कामाचे स्वरूप व आवश्यक संसाधने, नागरिकांशी संवाद, आरोग्य व विविध योजना बाबत पूरक माहिती अशा गोष्टींची क्षमता बांधणी करून घेण्यात आली.
अधिक वाचा –
– भुशी धरण परिसरातील कारवाईला तात्पुरती स्थगिती ; स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय होऊ देणार नाही – आमदार सुनिल शेळके
– ही बातमी वाचा मगच लोणावळ्यात जा, ‘ती’ दुर्घटना झाली आणि सगळंच बदललं ! पर्यटनाचे नवीन नियम लागू, ‘इथे’ थेट ‘नो-एन्ट्री’
– ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणी पैसे मागितले तर मला सांगा, कुणालाही पैसे देऊ नका – आमदार सुनिल शेळके