Dainik Maval News : मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहरामधील हुडको कॉलनी, कैलास नगर, इंद्रायणी नगर, भांगरवाडी, नांगरगाव, निसर्ग नगरी आणि वर्धमान सोसायटी या भागांतील शेकडो कुटुंबांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संपूर्ण तालुक्यात या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असून, प्रशासनाने या सर्व भागांचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित नागरिकांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.
तसेच, पाटण येथे दरड कोसळून तिकोणे कुटुंबातील ३ निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. शासनाने या घटनेची तात्काळ दखल घेत मृतांच्या वारसांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मंजूर करावी. तसेच, मावळमधील जी गावे ‘दरड प्रवण क्षेत्र’ म्हणून शासनाच्या दरबारी नोंदणीकृत आहेत, त्या सर्व गावांचे व तेथील नागरिकांचे संभाव्य धोका टाळण्यासाठी शासनाने तात्काळ सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी (दि.९ जुलै) पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
– पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू
– पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
