Dainik Maval News : मागील काही दिवसांपासून मावळ तालुक्यात परतीचा पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. या पावसामुळे शेतात उभे असलेले, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भाताचे पीक हातचे जात आहे. पिकाचे होणारे हे नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित मावळ तालुक्यात परतीचा पाऊस जोरदार बरसला. परंतु या परतीच्या पावसाचा तडाखा भात शेतीला बसला आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात पीक पावसामुळे जमिनीवर मोडून पडल्याचे प्रकार काही ठिकाणी घडलेत.
पवन मावळ विभागातील काही गावांत हे चित्र दिसत आहे. पवन मावळातील शिवली आणि परिसरातील गावांत परतीच्या पावसामुळे भाताचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्ण वाढ झालेले भात पीक पावसामुळे मोडून जमिनीवर कोसळत आहेत. यामुळे भाताच्या लोंब्या भिजत असून पिकाचे नुकसान होत आहे.
मावळात सध्या भात पीक कापणीला आले आहे. परंतु मजूर उपलब्ध नसल्याने किंवा मजूरी वाढल्याने कापण्या लांबणीवर पडल्याचे दिसत आहे. परतीच्या पावसाचा तडाखा आणि मजूर टंचाई सोबत मजूरीची वाढ यामुळे शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ ; यंदा पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
– महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची ही माहिती प्रत्येक मतदाराला असलीच पाहिजे, नक्की वाचा । Maharashtra Vidhan Sabha Election
– तळेगाव येथील होम मिनिस्टर स्पर्धेत गौरी दरेकर ठरल्या महाविजेत्या ; सत्तर वयापर्यंतच्या महिलांनी घेतला सहभाग । Talegaon Dabhade