Dainik Maval News : मावळ तालुक्यात भात कापणी झालेल्या ठिकाणचे शेतकरी आता रब्बी हंगामातील विविध पिकांच्या तयारीत गुंतले आहेत. त्यासाठी जमिनीची नांगरणी करतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. काही ठिकाणी पेरण्या देखील झाल्याचे दिसत आहे.
मावळात यंदा भात पीक चांगले आले होते. परंतु परतीच्या पावसाचा फटका काही भागातील शेतकऱ्यांना बसला. परंतु आता भाताची काढणी होऊन हाताशी आलेले पीक घरात नेल्यावर शेतकरी रब्बी हंगामासाठी सज्ज होतोय.
मावळ तालुका हा खरीप भात पिकाचे आगार म्हणून ओळखला जातो. सध्या खरीप हंगामातील भातशेती अंतिम टप्प्यात आली असून तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रब्बी हंगामाच्या शेतीची लगबग वाढली आहे.
तालुक्यात सध्या रब्बी हंगामाच्या भातशेतीच्या मशागतीची लगबग शेतांवर दिसत आहे. रब्बीच्या हंगामामध्ये शेतकरी विविध प्रकारच्या भाज्यांसह कडधान्ये जसे की गहू, ज्वारी, हरभरा, मसूर ही पिके घेत असतात. सध्या त्यासाठी नांगरणीची कामे सुरु आहेत. यंदा पावसाने शेतकऱ्यांना चांगला हात दिला. त्यामुळे परतीच्या पावसामुळे जमिनीमध्ये असलेल्या ओलाव्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी जमिनीची नांगरणी सुरू केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? वाचा भारतीय संविधानाची 9 मुख्य वैशिष्ट्ये । Constitution Day
– विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर : राज्यातील ‘हे’ 5 निकाल ठरले सर्वात धक्कादायक, अजूनही विश्वास बसेना
– भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल