Dainik Maval News : भारतात दिनांक 26 नोव्हेंबर ( 26 November ) हा संविधान दिन ( Constitution Day ) म्हणून साजरा केला जातो. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. जगभरातील सर्वच संविधानांचा तेव्हा बारकाईने अभ्यास केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसूदा समितीच्या सहाय्याने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता.
दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो मसूदा भारतीय संविधान सभेसमोर मांडण्यात आला आणि त्याच दिवशी तो स्विकारण्यात आला. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2015 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबरला ‘संविधान दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताचा गणराज्य दिन हा 26 जानेवारी असला तरीही देशात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. ( Constitution Day Know 9 Interesting Facts Of Indian Constitution )
भारतीय संविधानाची 9 खास वैशिष्ट्ये ;
1. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची सभेचे स्थायी अध्यक्ष होते.
2. संविधानाची मूळ प्रत कुणी लिहिली, असे विचारल्यावर अनेकजण बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात. पण खरेतर संविधानाची मूळ प्रत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात लिहिली गेली आहे.
3. संपूर्ण संविधान तयार होण्यासाठी साधारण 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला होता.
4. दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान पूर्ण झाले आणि भारतीय प्रजासत्ताकाची ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून देशात लागू झाली.
5. भारतीय संविधान हे लिखित स्वरुपातील तरतुदी असणारे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. भारतीय संविधानाच्या इंग्रजी प्रतीमध्ये 1,17,369 शब्द आहेत.
6. भारताचे संविधान हे 22 भाग, 448 कलमे, 22 याद्या आणि 12 अनुसूचीत विभागलेले आहे.
7. संविधानाची मूळ प्रत ही इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहिली गेली होती. त्यामुळे संविधानावर स्वाक्षरी करणाऱ्या सदस्यांना दोन प्रतींवर स्वाक्षरी करावी लागली.
8. भारतीय संविधानाची हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मूळ प्रत संसदेतील ग्रंथालयात असणाऱ्या एका पेटीत आजही जपून ठेवण्यात आली आहे.
9. डॉ. भीमराव आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. भारतीय संविधान सभेने संविधान निर्मितीशी संबंधित विविध कार्ये हाताळण्यासाठी एकूण 13 समित्यांची स्थापना केली होती. त्यातील मुख्य मसूदा समितीचे अध्यक्ष हे डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.
( Constitution Day Know 9 Interesting Facts Of Indian Constitution )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल
– अंतिम निकाल जाहीर : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहा सर्व 14 पक्षांची आकडेवारी । Maharashtra Assembly Election Final Result
– ‘आमदार’ होणार आता ‘नामदार’ ! सुनिल शेळके यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के? राज्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा