मावळ तालुक्यातील पवन मावळ हे भाताचे कोठार समजले जाते. पवन मावळ भागात जवळपास सर्वच गावात आज आधुनिक शेती पद्धतीने शेतकरी शेती करत आहेत. बऱ्याच दिवसा पासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. परंतु आता पाऊस हळुहळु सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवड चालू केल्या आहेत. मौजे मळवंडी ठुले गावातील प्रगतशील शेतकरी किसन ठुले यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवड कृषिसहाय्यक विकास गोसावी यांच्या मार्गदर्शना खाली दोन एकर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ह्यावर्षी जून महिन्यात रोपवाटिकाना पोषक असा पाऊस पडला होता. परंतु लागवडी साठी पोषक पाऊस नव्हता. त्यामुळे लागवडी सुरु नव्हत्या परंतु आता चांगला पाऊस चालू झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवड दोरीच्या साह्याने 15 बाय 25 सेंमी अंतरावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड वारू, शिळींब, मळवंडी ठुले, येळसे, महागाव, काले, मोरवे, चावसर, केवरे, प्रभाचीवाडी, करुंज, कडधे, सावंतवाडी, मालेवाडी, ब्रामणोली, शिवली, कोथुरणे इ. परिसरात चालू केल्या आहेत.
लागवडी नंतर यूरिया ब्रिकेट खत गोळ्याचा वापर चार चूडाच्या मधे एक गोळी अशा प्रकारे लागवडी नंतर दोन ते तीन दिवसात लावनार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाताच्या उत्पादनात वाढ होणार आहे. मजुराचा तुटवडा ह्यावर्षी ही जाणवू लागला आहे. ह्यांमुळे लोक आधुनिक लागवडीकडे वळले आहेत ह्या वर्षी बहुसंख्य शेतकरी चारसुत्री पध्दतीने लागवड करत आहेत. शेतकरी भातलावणी करताना दोन ते तीनच भातरोपे लावत आहेत. कमी रोपे लागत असल्यामुळे ही पद्धत शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. पवनमावळ भागात ह्यावर्षी चारसूत्री पद्धतीला शेतकऱ्यांनी पसंती दिल्याचे व त्याच बरोबर एस. आर. टी., यंत्राने, पेर भात, लागवड पद्धतीने शेतकऱ्यांनी लागवड केली असल्याचे कृषिसहायक विकास गोसावी व मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांनी सांगितले.
‘ह्यावर्षी पवन मावळ भागातील शेतकऱ्यांनी चारसूत्री पद्धतीला प्राधान्य दिले आहे. लागवडी नंतर शेतकरयांनी युरिया ब्रिकेट गोळी खत द्यावे. तसेच भात पिकाचा विमा काढून घ्यावा. म्हणजे भातपिकाला सुरक्षा कवच असल्याने फायदा होईल,’ मंडळ कृषि अधिकारी प्रशांत डहाळे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– मावळात दमदार पावसाची हजेरी ; पवनमावळ भागात चारसूत्री पद्धतीने भात लागवडीला वेग
– मावळ तालुक्यातील एखाद्या गावात 40 प्रवासी असल्यास त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडली जाणार । Maval News
– पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने नौकाविहार नियमावली ; बोट क्लब मालकांसाठी अनेक नियम-अटी, वाचा सविस्तर । Pune News