मराठा आरक्षण मागणीसाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा मार्ग जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. परंतू, त्यासाठी ते 20 जानेवारी रोजी त्यांचे गाव अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करणार आहे. त्यांच्या पायी प्रवासात अंतरवली ते मुंबई दरम्यान मुक्काम कुठे कुठे असणार आहे, याबाबत स्वतः जरांगेंनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अंतरवाली येथून केव्हा निघणार, कुठे मुक्काम असणार, मुंबईत किती लोक येणार? हेही मनोज जरांगेंनी सांगितले. मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी मुंबईसाठी सकाळी 9 वाजता निघतील. त्यानंतर सर्व मराठा बांधव शंभर टक्के मुंबई जाणार आहे. त्यांनी आपल्या खाण्या पिण्याच्या वस्तू सोबत घ्यायच्या आहेत. शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ( Maratha Reservation Manoj Jarange Patil To Begin Indefinite Hunger Strike In Mumbai From January 26 Read Plan )
असा असणार पायी मार्ग :
- 20 जानेवारी पहिला मुक्काम – बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात (बीड)
- 21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (अहमदनगर)
- 22 जानेवारी तिसरा मुक्काम – रांजणगाव (पुणे जिल्हा)
- 23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास (पुणे)
- 24 जानेवारी पाचवा मुक्काम – लोणावळा (पुणे)
- 25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी (नवी मुंबई)
- 26 जानेवारी 7 वा मुक्काम – आझाद मैदान (आंदोलन स्थळी)
पुण्यात दोन दिवस थांबणार, पुणे पाहणार –
‘पुण्यामध्ये मराठा समाज बांधवाचा आकडा एक करोडो होणार आहे. आम्ही पुण्यात दोन दिवस थांबणार आहे. आम्हाला पुणे बघायचे आहे. पुण्यावरुन सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाणार आहे. मुंबई जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत. त्यांनी झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे. मुंबई जाताना कुणीही व्यसन करायचे नाही. तसेच प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल त्यांनी ते घेऊन यावे,’ असे आवाहन जरांगे यांनी.
आता सरकारला वेळ द्यायचा नाही –
‘प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्यांच्या गावाच्या हद्दीपर्यंत मराठा कार्यकर्त्यांसोबत चालायचे आहे. अंतरवलीमधून मी एकटा निघणार आहे. मग सोबत एक लाख असो की एक कोटी असो, ते पाहिले जाईल. रोज पायी बारावाजेपर्यंत चालायचे आहे. त्यानंतर मुक्कामी करायचा आहे. 90 ते 100 किलोमीटरवरच्या आत मुक्काम असणार आहे. आता सरकारला आता वेळ द्यायचा नाही,’ असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pradhan Mantri Awas Yojana
– मकर संक्रांतीनिमित्त एकापेक्षा एक खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, तुमच्या प्रिय व्यक्तींना पाठवा तिळगुळासारखे गोड मेसेज। Makar Sankranti Marathi Wishes
– ‘द कॉर्बेट फाऊंडेशन’ आणि ‘एचडीएफसी बँक – परिवर्तन’ मार्फत वनविभागाला 140 फॉरेस्ट कीटचे वाटप