नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. शेखर रहाणे यांनी केली. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त महेश शाहा, सोनबा गोपाळे, अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. विलास देवतारे, एनसीईआरच्या प्राचार्या डो. अपर्णा पांडे, नवीन समर्थ महाविद्यालयाच्या प्राचार्या वासंती काळोखे आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बारावी सायन्स नंतरचे विविध करिअरची अचूक निवड, अभियांत्रिकी तसेच विविध विभागांतील प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शन, विविध शाखांमधील संधी आदी विषयांवर प्रा. शांकर उगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी नंतरच्या करिअर संधी, व्यवसाय मार्गदर्शन, शाखेची निवड, महाविद्यालय निवडीमधील निकष या विषयांवर डॉ. विलास देवतारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन वासंती काळोखे यांनी केले. नियोजन प्रा. प्रतीक्षा तनपुरे, प्रीती घुले यांनी केले.
अधिक वाचा –
– कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! 7 जणांवर गुन्हा दाखल, हजारोंचा मुद्देमाल जप्त
– खासदारकीची हॅटट्रीक करून दिल्ली गाठताच मावळचे खासदार श्रीरंग बारणेंवर शिवसेना पक्षाकडून मोठी जबाबदारी !
– मोठी बातमी ! नरेंद्र मोदी यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, एनडीएच्या नेतेपदी एकमुखी निवड, ‘या’ दिवशी होणार शपथविधी